शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला, किशोर तिवारी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:26 IST

भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले.

यवतमाळ  - भाजप सरकारने दिलेल्या शब्दांचे पालन केले नाही. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून अधिकार दिले. मात्र नंतर त्यावर मर्यादा घातल्या. त्यामुळे अपेक्षित काम करता आले नाही. पाच वर्षे माझा केवळ टॉयलेट पेपरसारखा वापर केला गेला, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष तथा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला. किशोर तिवारी म्हणाले, भाजप सोबत २०१९ पर्यंतचा करार संपला आहे. शेतकरी, आदिवासी व मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारसोबत बसलो. मात्र त्यांनी दगा दिला. २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही. १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पांढरकवडा येथे जाहीर सभा झाली. या सभेचे संपूर्ण नियोजन माझ्याकडे होते. सभेला उपस्थितीही भरपूर होती. त्यानंतरही या सभेत माझा अपमान करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थेट अपमान केला. पंतप्रधान मोदींनीसुद्धा भाषणात माझा नामोल्लेखही केला नाही. वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नाही१९७७ पासून जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीत जुळलो आहे. त्यानंतरही भाजप सरकारकडून सन्मानाची वागणूक देण्यात आली नाही. सरकारकडे अधिका-यांच्या बदल्या, ठेकेदारी, कोळसा ट्रान्सपोर्टिंग या सारख्या वैयक्तिक लाभासाठी पद मागितले नसल्याचे तिवारी यांनी सांगितले. भाजपला धडा शिकविणारआता जिल्ह्यातील चार मतदारसंघातून विदर्भ जनआंदोलन समिती विधानसभा निवडणूक लढणार असून, आपला केवळ वापर करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाKishor Tiwariकिशोर तिवारीYavatmalयवतमाळ