शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपचा सहाव्या मतदारसंघावर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संख्याबळाने भाजपपेक्षा सरस असल्याने शिवसेनेला विधानसभेच्या अर्ध्या जागांची मागणी होत असतानाच भाजप जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघ स्वत: लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसे झाल्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : शिवसेनेकडे केवळ दिग्रस, उमरखेडमध्ये उमेदवार रिपाइंचा, चिन्ह भाजपचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संख्याबळाने भाजपपेक्षा सरस असल्याने शिवसेनेला विधानसभेच्या अर्ध्या जागांची मागणी होत असतानाच भाजप जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघ स्वत: लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसे झाल्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.जिल्ह्यात सध्या सात पैकी पाच जागा भाजपकडे तर शिवसेना व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वबळावर लढले होते. अनेक ठिकाणी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आहेत, जिल्हा परिषदेमध्ये २० सदस्य आहेत, अनेक नगरपरिषदा, पंचायती, सहकारी संस्था शिवसेनेच्या आहेत. भाजप एवढीच आमची ताकद आहे, असे सांगत शिवसेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिग्रस, पुसदशिवाय वणी व उमरखेड या नव्या मतदारसंघांवर जोरदार दावा सांगितला होता. एवढेच नव्हे तर यवतमाळची जागाही मागण्यात आली होती. शिवसेनेचा जोर पाहता किमान वणी, उमरखेड हे अतिरिक्त दोन मतदारसंघ शिवसेनेला सुटतील असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात भाजप जिल्ह्यामध्ये सेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे.सूत्रानुसार, जिल्ह्यातील सात पैकी सहा जागा भाजप स्वत: लढणार आहे. युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या पुसदच्या जागेवरही आता भाजपने दावा सांगितला आहे. अर्थात जुन्या पाच जागा ‘सिटींग-गेटींग’ या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे कायम असून पुसदची अतिरिक्त जागाही भाजपने जवळजवळ मिळविल्याचे सांगितले जाते. ते पाहता जिल्ह्यात खासदार, राज्यमंत्री, तीन जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० सदस्य असताना शिवसेनेला केवळ आपल्या दिग्रस या एकाच जागेवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. पुसद भाजपला देऊन उमरखेड शिवसेनेसाठी मागितला जात असला तरी प्रत्यक्षात ही जागा रिपाइंच्या आठवले गटाने मागितली आहे. विदर्भातील एकमेव जागा मागितल्याने ही जागा रिपाइंला सोडण्याचेही निश्चित झाले आहे. केवळ ‘उमेदवार रिपाइंचा आणि चिन्ह भाजप’चे या प्रयोगावर बोलणी सुरू आहे. आतापर्यंत उमेदवार रिपाइंचा तर चिन्हही रिपाइंचेच अशी ताठर भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप श्रेष्ठींपुढे घेतली होती. रिपाइंची ओळखच संपून जाईल, असा आठवलेंचा या मागील युक्तीवाद होता.मात्र भाजप नमते घेत नसल्याचे पाहून अखेर आठवलेंनी आपला उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढविण्याची तत्वत: तयारी दर्शविल्याचे रिपाइंच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे उमरखेडची जागा रिपाइंला सुटल्यास शिवसेनेकडे पर्याय म्हणून ही जागा घेण्याचीही सोय राहणार नाही. अशावेळी दिग्रसच्या एकाच जागेवर सेनेला समाधान मानावे लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक