शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:09 IST

थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ८० वर्षांच्या रेणुकाबाई यांनी जागविल्या यवतमाळातील परिवर्तनाच्या आठवणी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे. आता जमाना बदलला, लोकं बी हुशार झाले. जयंतीची मिरवणूक बी झोकात काहाडतेत... पाटीपुरा परिसरातील ८० वर्षीय रेणुकाबार्इंचे हे शब्द आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त यवतमाळातील आंबेडकरी समाजाच्या बदलत्या परिस्थितीविषयी साधलेला संवाद...यवतमाळातच जन्म आणि यवतमाळातच सासर असलेल्या रेणुका श्रावण गणवीर यांनी ८० वर्षांतील बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुका पाहिल्या आहेत. एवढ्या वर्षातले बदल सांगताना त्या म्हणाल्या, मी पयले तलावफैलात राहो. तेथले मजूर गरीब आसन, पण बाबासाहेबाच्या जयंतीला लागन तेवढे पैसे द्याले सारे तयारस राहे. दोन-दोन महिन्यापयलेच वर्गण्या जमा कराले लागे. आताबी जयंतीसाठी पैसे खर्चाले कोणी मांग-पुढं पाहात नाई. आता करने सवरनेवाले पोरं लय हुशार झाले. मंडप मस्त करतेत. तवा निस्ता बँड राहे, आता डीजे लावतत. तलावफैलात येक आखाडा होता. सारे तिथंच जमे. पण ८० साली थो पडला. बाबासाहेबाच्या धोरणाच्यानंच तलावफैलातल्या मजुरायचे मस्त घरं झाले आता, पयले निस्त्या कौलाच्या झोपड्या होत्या. पण नुसते घरं नाई बदलले आता लोकं बदलले. पुस्तकं वाचाले लागले. नव्या पोराईले तं सबन समजाले लागलं. आसं करा, तसं करा म्हणून पोरंस आमाले सांगते....रेणुकाबाई गणवीर यांनी अशा विविध आठवणींमधून यवतमाळातील बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमांच्या आठवणी जागविल्या.तवा पेपर नव्हते. बाया भारा आणाले जंगलात गेल्या का येकमेकीले बातम्या सांगे.. मस्त झालं वं बाबासाहेबाचं भाषण... - रेणुकाबाई गणवीरबाबासाहेब गेले, थ्याच वर्सी महा लगन झालं. बाबासाहेब गेले म्हणून यवतमाळात हे फोनावर फोन याले लागले होते. साऱ्यायची धांदल उडून गेल्ती. लगनात बयनीनं आंदन म्हणून आणलेल्या भांड्यावर तारीख हाये... अशी आठवण रेणुकाबाई गणवीर सांगतात..!बाबासाहेबांचं भाषण अन् दुधाची विक्रीरेणुकाबाई म्हणाल्या, यवतमाळात कवा बाबासाहेब आल्याचं माहीत नाई. पण येकडाव पुलगावले बाबासाहेबाचं रात्री भाषण झालं. यवतमाळातून लई लोक गेल्ते. माही शेजारी तेवरेबाई दुध विकाचा धंदा करे. थे जाऊन आल्ती. तेवरेबाई सांगे, बाबासाहेबाच्या भाषणामुळे भरमसाठ दूध खपलं थ्या रात्री. रातभर पाह्यलं बाबासाहेबाले आसं तेवरेबाई मले कितीतरी डाव अभिमानानं सांगे. आता तेवरेबाई मरणपावली. तिचं पोरगंबी आता म्हतारं झालं. जुना काळच अलग होता.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती