शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:09 IST

थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ८० वर्षांच्या रेणुकाबाई यांनी जागविल्या यवतमाळातील परिवर्तनाच्या आठवणी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे. आता जमाना बदलला, लोकं बी हुशार झाले. जयंतीची मिरवणूक बी झोकात काहाडतेत... पाटीपुरा परिसरातील ८० वर्षीय रेणुकाबार्इंचे हे शब्द आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त यवतमाळातील आंबेडकरी समाजाच्या बदलत्या परिस्थितीविषयी साधलेला संवाद...यवतमाळातच जन्म आणि यवतमाळातच सासर असलेल्या रेणुका श्रावण गणवीर यांनी ८० वर्षांतील बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुका पाहिल्या आहेत. एवढ्या वर्षातले बदल सांगताना त्या म्हणाल्या, मी पयले तलावफैलात राहो. तेथले मजूर गरीब आसन, पण बाबासाहेबाच्या जयंतीला लागन तेवढे पैसे द्याले सारे तयारस राहे. दोन-दोन महिन्यापयलेच वर्गण्या जमा कराले लागे. आताबी जयंतीसाठी पैसे खर्चाले कोणी मांग-पुढं पाहात नाई. आता करने सवरनेवाले पोरं लय हुशार झाले. मंडप मस्त करतेत. तवा निस्ता बँड राहे, आता डीजे लावतत. तलावफैलात येक आखाडा होता. सारे तिथंच जमे. पण ८० साली थो पडला. बाबासाहेबाच्या धोरणाच्यानंच तलावफैलातल्या मजुरायचे मस्त घरं झाले आता, पयले निस्त्या कौलाच्या झोपड्या होत्या. पण नुसते घरं नाई बदलले आता लोकं बदलले. पुस्तकं वाचाले लागले. नव्या पोराईले तं सबन समजाले लागलं. आसं करा, तसं करा म्हणून पोरंस आमाले सांगते....रेणुकाबाई गणवीर यांनी अशा विविध आठवणींमधून यवतमाळातील बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमांच्या आठवणी जागविल्या.तवा पेपर नव्हते. बाया भारा आणाले जंगलात गेल्या का येकमेकीले बातम्या सांगे.. मस्त झालं वं बाबासाहेबाचं भाषण... - रेणुकाबाई गणवीरबाबासाहेब गेले, थ्याच वर्सी महा लगन झालं. बाबासाहेब गेले म्हणून यवतमाळात हे फोनावर फोन याले लागले होते. साऱ्यायची धांदल उडून गेल्ती. लगनात बयनीनं आंदन म्हणून आणलेल्या भांड्यावर तारीख हाये... अशी आठवण रेणुकाबाई गणवीर सांगतात..!बाबासाहेबांचं भाषण अन् दुधाची विक्रीरेणुकाबाई म्हणाल्या, यवतमाळात कवा बाबासाहेब आल्याचं माहीत नाई. पण येकडाव पुलगावले बाबासाहेबाचं रात्री भाषण झालं. यवतमाळातून लई लोक गेल्ते. माही शेजारी तेवरेबाई दुध विकाचा धंदा करे. थे जाऊन आल्ती. तेवरेबाई सांगे, बाबासाहेबाच्या भाषणामुळे भरमसाठ दूध खपलं थ्या रात्री. रातभर पाह्यलं बाबासाहेबाले आसं तेवरेबाई मले कितीतरी डाव अभिमानानं सांगे. आता तेवरेबाई मरणपावली. तिचं पोरगंबी आता म्हतारं झालं. जुना काळच अलग होता.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती