शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:09 IST

थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ८० वर्षांच्या रेणुकाबाई यांनी जागविल्या यवतमाळातील परिवर्तनाच्या आठवणी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे. आता जमाना बदलला, लोकं बी हुशार झाले. जयंतीची मिरवणूक बी झोकात काहाडतेत... पाटीपुरा परिसरातील ८० वर्षीय रेणुकाबार्इंचे हे शब्द आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त यवतमाळातील आंबेडकरी समाजाच्या बदलत्या परिस्थितीविषयी साधलेला संवाद...यवतमाळातच जन्म आणि यवतमाळातच सासर असलेल्या रेणुका श्रावण गणवीर यांनी ८० वर्षांतील बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुका पाहिल्या आहेत. एवढ्या वर्षातले बदल सांगताना त्या म्हणाल्या, मी पयले तलावफैलात राहो. तेथले मजूर गरीब आसन, पण बाबासाहेबाच्या जयंतीला लागन तेवढे पैसे द्याले सारे तयारस राहे. दोन-दोन महिन्यापयलेच वर्गण्या जमा कराले लागे. आताबी जयंतीसाठी पैसे खर्चाले कोणी मांग-पुढं पाहात नाई. आता करने सवरनेवाले पोरं लय हुशार झाले. मंडप मस्त करतेत. तवा निस्ता बँड राहे, आता डीजे लावतत. तलावफैलात येक आखाडा होता. सारे तिथंच जमे. पण ८० साली थो पडला. बाबासाहेबाच्या धोरणाच्यानंच तलावफैलातल्या मजुरायचे मस्त घरं झाले आता, पयले निस्त्या कौलाच्या झोपड्या होत्या. पण नुसते घरं नाई बदलले आता लोकं बदलले. पुस्तकं वाचाले लागले. नव्या पोराईले तं सबन समजाले लागलं. आसं करा, तसं करा म्हणून पोरंस आमाले सांगते....रेणुकाबाई गणवीर यांनी अशा विविध आठवणींमधून यवतमाळातील बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमांच्या आठवणी जागविल्या.तवा पेपर नव्हते. बाया भारा आणाले जंगलात गेल्या का येकमेकीले बातम्या सांगे.. मस्त झालं वं बाबासाहेबाचं भाषण... - रेणुकाबाई गणवीरबाबासाहेब गेले, थ्याच वर्सी महा लगन झालं. बाबासाहेब गेले म्हणून यवतमाळात हे फोनावर फोन याले लागले होते. साऱ्यायची धांदल उडून गेल्ती. लगनात बयनीनं आंदन म्हणून आणलेल्या भांड्यावर तारीख हाये... अशी आठवण रेणुकाबाई गणवीर सांगतात..!बाबासाहेबांचं भाषण अन् दुधाची विक्रीरेणुकाबाई म्हणाल्या, यवतमाळात कवा बाबासाहेब आल्याचं माहीत नाई. पण येकडाव पुलगावले बाबासाहेबाचं रात्री भाषण झालं. यवतमाळातून लई लोक गेल्ते. माही शेजारी तेवरेबाई दुध विकाचा धंदा करे. थे जाऊन आल्ती. तेवरेबाई सांगे, बाबासाहेबाच्या भाषणामुळे भरमसाठ दूध खपलं थ्या रात्री. रातभर पाह्यलं बाबासाहेबाले आसं तेवरेबाई मले कितीतरी डाव अभिमानानं सांगे. आता तेवरेबाई मरणपावली. तिचं पोरगंबी आता म्हतारं झालं. जुना काळच अलग होता.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती