शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नेर तालुक्यात वादळाने मोठी हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:12 IST

गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा बंद : ३० गावांना बसला तडाखा, चिकणी डोमगा येथे कुक्कुटपालनाचे शेड उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.तालुक्याच्या काही भागात पाऊस झाला. वादळाचा तडाखा मोझर, टेंभी, शिरसगाव आदी परिसराला बसला. मोझर येथे किरण चव्हाण या महिलेसह काही लोकांना किरकोळ दुखापत झाली. बालू निचत यांच्या कृषी मालाच्या गोडाऊनवरील टीनपत्रे उडाली. एक म्हैस दगावली. काही भागात वीज खांब कोसळले, तारा तुटल्या. वीज बंद असल्याने पीठगिरणीसारखे व्यवसाय ठप्प झाले आहेत.चिकणी (डोमगा) येथील शेख अनिस यांचे कुक्कुट पालनाचे शेड वाऱ्यामुळे उडाले. या प्रकारात जवळपास ३०० कोंबड्या मृत झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरातील काही फळबागांनाही वादळाचा फटका बसला. जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील यांच्या बगीच्यातील लिंबाची ३० झाडे जमिनदोस्त झाली. हौसाबाई आश्रमशाळेची टीनपत्रे उडाली. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी महसूल विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.शिरसगाव परिसरात घरांची पडझड, वीज तारा तुटल्याशिरसगाव(पांढरी) : मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घराची पडझड झाली. टीनपत्रे दूरपर्यंत उडाली. वीज तारा तुटल्याने गेली दोन दिवसांपासून सर्वत्र अंधार आहे. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवू लागला होता. सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाला सुरुवात झाली. सोबतच मूसळधार पाऊसही बरसला. वाºयामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पावसाने भिजलेल्या अंथरूण-पांघरुणावर त्यांना रात्र काढावी लागली. वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचाही सामना करावा लागला. झालेल्या नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस