शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्पर्धा परीक्षेत भरारी घेणारी भंडारीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुक्यात वेगळी ओळख : निवासी सुसंस्कार शिबिर, मातृप्रबोधन कार्यशाळा, दरवर्षी नवोदयमध्ये यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोरगरिबांची खेड्यापाड्यात अभावग्रस्त जीवन जगणारी निरागस मुलेही स्पर्धेच्या युगात पुढे गेली पाहिजे, या निर्धाराने पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळा वेगळी वाटचाल करीत आहे. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच चक्क प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेण्याचा या शाळेचा पायंडा उपयुक्त ठरला आहे.भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.रोजमजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यात भंडारीच्या शाळेला यश मिळाले. या शाळेने चालविलेल्या हंगामी वसतिगृहाला चांगला प्रतिसाद आहे. जादा वर्ग घेऊन शाळेत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. उन्हाळी सुटीत निवासी स्वरूपाचे सुसंस्कार शिबिर घेतले जाते. यात विद्यार्थ्यांसह प्रौढ पालकही सहभागी होतात. नियमित पालकसभा आणि मातृप्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शालेय परिसर हिरवागार आणि गाव परिसरातही वृक्षारोपण व संवर्धन करणारी भंडारी जिल्हा परिषद शाळा आकर्षण ठरली आहे.गावकरी वाचनालय रुजविलेभंडारीच्या शाळेने लोकसहभाग मिळवून गावात चक्क गावकरी वाचनालय सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावातील रोजमजुरी करणाºया पालकांनाही वाचनाची सवय लागली आहे.भंडारीत सुरू झालेला स्नेहभोजनाचा उपक्रम नंतर शासनाने राज्यभरात लागू केला, हे विशेष. भंडारीत आजही या उपक्रमात मिष्ठान्नासह पौष्टीक आहारही विद्यार्थ्यासह पालकांनाही दिला जातो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षक स्वखर्चाने साहित्य पुरवितात.आमच्या एकूण पटापैकी ४६ टक्के मुले बाहेरगावची आहेत. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने इच्छा असूनही परगावातील अनेक मुलांना भंडारीत येता येत नाही. प्रगती दिसली तर पालक माध्यम व इतर गोष्टी पाहत नाही. पालकांचे समाधान आणि बालकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे.- गणेश एस. चव्हाण, मुख्याध्यापकआम्हा गावकऱ्यांना आमच्या शाळेचा अभिमान आहे. शिक्षकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे यंदा पाच विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.- गजानन इंगोले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीआमच्या शिक्षकांनी गावातील सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला. गणेश चव्हाण यांच्यामुळे शाळेचा कायापालट झाला.- मनोहर जाधव,पालक

टॅग्स :Schoolशाळा