शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

स्पर्धा परीक्षेत भरारी घेणारी भंडारीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुक्यात वेगळी ओळख : निवासी सुसंस्कार शिबिर, मातृप्रबोधन कार्यशाळा, दरवर्षी नवोदयमध्ये यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोरगरिबांची खेड्यापाड्यात अभावग्रस्त जीवन जगणारी निरागस मुलेही स्पर्धेच्या युगात पुढे गेली पाहिजे, या निर्धाराने पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळा वेगळी वाटचाल करीत आहे. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच चक्क प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेण्याचा या शाळेचा पायंडा उपयुक्त ठरला आहे.भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.रोजमजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यात भंडारीच्या शाळेला यश मिळाले. या शाळेने चालविलेल्या हंगामी वसतिगृहाला चांगला प्रतिसाद आहे. जादा वर्ग घेऊन शाळेत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. उन्हाळी सुटीत निवासी स्वरूपाचे सुसंस्कार शिबिर घेतले जाते. यात विद्यार्थ्यांसह प्रौढ पालकही सहभागी होतात. नियमित पालकसभा आणि मातृप्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शालेय परिसर हिरवागार आणि गाव परिसरातही वृक्षारोपण व संवर्धन करणारी भंडारी जिल्हा परिषद शाळा आकर्षण ठरली आहे.गावकरी वाचनालय रुजविलेभंडारीच्या शाळेने लोकसहभाग मिळवून गावात चक्क गावकरी वाचनालय सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावातील रोजमजुरी करणाºया पालकांनाही वाचनाची सवय लागली आहे.भंडारीत सुरू झालेला स्नेहभोजनाचा उपक्रम नंतर शासनाने राज्यभरात लागू केला, हे विशेष. भंडारीत आजही या उपक्रमात मिष्ठान्नासह पौष्टीक आहारही विद्यार्थ्यासह पालकांनाही दिला जातो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षक स्वखर्चाने साहित्य पुरवितात.आमच्या एकूण पटापैकी ४६ टक्के मुले बाहेरगावची आहेत. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने इच्छा असूनही परगावातील अनेक मुलांना भंडारीत येता येत नाही. प्रगती दिसली तर पालक माध्यम व इतर गोष्टी पाहत नाही. पालकांचे समाधान आणि बालकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे.- गणेश एस. चव्हाण, मुख्याध्यापकआम्हा गावकऱ्यांना आमच्या शाळेचा अभिमान आहे. शिक्षकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे यंदा पाच विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.- गजानन इंगोले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीआमच्या शिक्षकांनी गावातील सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला. गणेश चव्हाण यांच्यामुळे शाळेचा कायापालट झाला.- मनोहर जाधव,पालक

टॅग्स :Schoolशाळा