शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 22:24 IST

व्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो.  राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे.  दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताची चिकित्सा करण्यात आली. रस्ता सरळ व सुटसुटीत असतानाही अपघात का होतात, हा प्रश्न उपस्थित करून चौकशी केली असता तब्बल ३०२ प्राणांकित अपघात झाले. यात ३१८ जणांचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रीय महामार्ग ३६१ यावर कळंब ते उमरखेड दरम्यान जिल्हा वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा पोलिस दल यांच्याकडून संयुक्त प्रयत्न करण्यात आले. यात अनेक व्यावसायिकांनी आपल्या सोईसाठी महामार्गावरील दुभाजक तोडल्याचे आढळून आले. अशा विरोधात पोलिसांनी स्वत:हून तक्रार देत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात पुढील कारवाई केली जात आहे. पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. शासकीय संपत्तीचे नुकसान पडेल महागात- भारतीय दंड विधान यातील कलम ४३१ गुन्हा दाखल करून त्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. - याशिवाय सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम यातील कलम ३, ५ नुसार गुन्हा दाखल केला जातो व कारवाई होते. 

जिल्ह्यात दहा महिन्यांत नऊ जणांवर कारवाई पोलिसांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक तोडणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर नऊ ठिकाणी सोयीसाठी दुभाजक तोडल्याचे निदर्शनास आले आहे. यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहे. 

अपघाताची शक्यता वाढते ठरावीक अंतरावरच महामार्गाच्या दुभाजकावर वळण्यासाठी जागा दिलेली आहे. मात्र, व्यावसायिकांनी आपला ढाबा, पेट्रोलपंप याच्यासमोरच दुभाजक तोडल्याने लेन कटिंगचा प्रकार वाढला. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. 

पेट्रोलपंप, हॉटेल चालकांनो सावधानव्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे. दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर कळंब ते उमरखेड दरम्यान कारवाई- नागपूर ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. या मार्गावर अपघात वाढले. याचे कारण शोधले असता कळंंब ते उमरखेड दरम्यान अनेक ठिकाणी सोईने दुभाजक तोडल्याचे आढळून आले आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस