शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

जिल्ह्यातील जलाशयांनी गाठला तळ

By admin | Updated: June 2, 2015 00:20 IST

पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही.

१७ टक्के पाणी : पाऊस लांबल्यास जल संकट गंभीरयवतमाळ : पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही. अशा अवस्थेत जिल्ह्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील जलाशयात केवळ १७.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लाबंल्यास जल संकट गंभीर होण्याची चिन्हे आहे. गत चार वर्षातील ही सर्वाधिक घसरण होय. जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. मे अखेर प्रचंड तापमानाने पाण्याचे बाप्षीभवन मोठ्या प्रमाणात होते. कोरडे वातावरण आणि वाढलेल्या तापमानामुळे ही प्रक्रिया मागील तीन वर्षाच्या तुलनेत अधिक गतीने होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेबंळा प्रकल्पात सध्या ३४ टक्के पाणी साठा आहे. पाटबंधारे महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या मोठा प्रकल्प पुसमध्ये केवळ १२.५७ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्प गोकी, वाघाडी, सायखेडा, लोअर पुस, बोरगांव येथे सरासरी २२.९५ टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ६२ लघु प्रकल्पामध्ये केवळ १२.८७ टक्के इतके च पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी होतो. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सिंचन तलावांचीही अवस्था बिकट आहे. त्यामध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ६९ सिंचन तलाव आहेत. तर २५० पाझर तलावत आहे. यातून खरिप आणि रबीचे सिंचन केले जाते. हे प्रकल्प फेब्रुवारीनंतर कोरडे पडणार हे गृहीत धरून सिंचनाचे नियोजन केले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)