शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यातील जलाशयांनी गाठला तळ

By admin | Updated: June 2, 2015 00:20 IST

पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही.

१७ टक्के पाणी : पाऊस लांबल्यास जल संकट गंभीरयवतमाळ : पावसाळ्यात अपुरा झालेला पाऊस. प्रचंड तापलेला उन्हाळा आणि जून महिन्याला प्रारंभ झाला तरी पावसाचा पत्ता नाही. अशा अवस्थेत जिल्ह्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील जलाशयात केवळ १७.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लाबंल्यास जल संकट गंभीर होण्याची चिन्हे आहे. गत चार वर्षातील ही सर्वाधिक घसरण होय. जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. मे अखेर प्रचंड तापमानाने पाण्याचे बाप्षीभवन मोठ्या प्रमाणात होते. कोरडे वातावरण आणि वाढलेल्या तापमानामुळे ही प्रक्रिया मागील तीन वर्षाच्या तुलनेत अधिक गतीने होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेबंळा प्रकल्पात सध्या ३४ टक्के पाणी साठा आहे. पाटबंधारे महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या मोठा प्रकल्प पुसमध्ये केवळ १२.५७ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्प गोकी, वाघाडी, सायखेडा, लोअर पुस, बोरगांव येथे सरासरी २२.९५ टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ६२ लघु प्रकल्पामध्ये केवळ १२.८७ टक्के इतके च पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खऱ्या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्यासाठी होतो. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सिंचन तलावांचीही अवस्था बिकट आहे. त्यामध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ६९ सिंचन तलाव आहेत. तर २५० पाझर तलावत आहे. यातून खरिप आणि रबीचे सिंचन केले जाते. हे प्रकल्प फेब्रुवारीनंतर कोरडे पडणार हे गृहीत धरून सिंचनाचे नियोजन केले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)