शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

आरोग्य, झेडपीतील १९ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 11:31 IST

जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील १३ हजार आणि आरोग्य विभागातील सहा हजार, अशा १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे. यामुळे या पदासाठी अर्ज भरून ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी या पदाकरिता अर्ज केलेले आहे. त्यांना भरती प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

आरोग्य विभागामध्ये सहा हजार पदांसाठी २०२१ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. या पदाकरिता नव्याने प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार हा उमेदवारांचा प्रश्न आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गातील १३ हजार पदांकरिता अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. सन २०१९ मध्येच यासाठीचे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. परंतु या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना ना कॉल आले, ना परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांचा कालावधी लोटूनही भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेमके घोडे कुठे अडले हा त्यांचा प्रश्न आहे. उमेदवारांनी आंदोलने केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ