शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा; नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:43 IST

Nagpur : आढावा बैठकीत आमदार नामदेव ससाणे यांचे यंत्रणेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : उमरखेड व महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरटा, चिखली व दराटी येथील घरे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या पाश्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी घरासह शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, असे निर्देश आमदार नामदेव ससाणे यांनी यंत्रणेला दिले.

अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. सर्वेक्षण करतेवेळी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या. त्यांना दिलासा द्या, असे आवाहन करण्यात आले. उमरखेड तालुक्यात ६५ हजार ५१० हेक्टर पेरणीची नोंद असून, २५ हजार ५२१ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातली दळणवळण व्यवस्था पावसात खराब झालेल्या रस्त्यामुळे थांबायला नको, यासाठी रस्ता दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. पुरापासून धोका निर्माण झालेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने गावागावात फवारणी करा, अशा सूचना करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानग्रस्त गावातील नाल्यावर संरक्षक भिंतीसाठी अहवाल पाठविण्याचे सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड व महागाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता सा.बां. विभाग जि.प. बांधकाम विभाग क्र. २. उपकार्यकारी अभियंता मराविमं, उपकार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वीज वितरणच्या अभियंत्याला धारेवर धरलेशांतता समितीच्या बैठकीला गैरहजर असणारे वीज वितरणचे अभियंता जैन हे आढावा बैठक संपत असताना आले. उत्सव काळात रात्रीच्या वेळी वीज गायब होते. महिनाभरापासून प्रत्येक दहा मिनिटांत तीन वेळा वीज ट्रिप होते. वीज वितरणने उमरखेड शहराला वाऱ्यावर सोडल्याने आमदार ससाणे यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. शहर आधीच संवेदनशील आहे. उत्सवाच्या काळात बत्ती गुल व्हायला नको, असे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाfarmingशेतीYavatmalयवतमाळ