शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

विधानसभेचा बिगूल वाजणार पण पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:53 IST

निवडणुकीची प्रतीक्षा : प्रशासकराजमुळे गाव विकासकामांना लागला ब्रेक

देवेंद्र पोल्हे लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे दोन, अडीच वर्षांपासून मिनी मंत्रालय म्हणून गावखेड्यात ओळख असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. प्रशासक राजमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असून, गावाच्या विकासालाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मागील दोन वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आलेला आहे. पदाधिकारी नसल्यामुळे अधिकाऱ्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही.

राजकारणी वाट पाहून थकले गावपुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागलेले आहे, परंतु निवडणुकीचा कोणताही अंदाज दिसत नसल्यामुळे तेही आता शांतच बसलेले आहेत.

प्रशासकराज' कधी हटणार विधानसभा निवडणूक निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाल्यावर म्हणजे पुढच्या वर्षी २०२५ मध्ये फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणूक होऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवरील प्रशासक राज हटणार आहे.

विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित 

  • निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती संकलन सुरू केले आहे. 
  • सुधारित मतदान केंद्र बनवून ती घोषित केली आहेत. सोबतच मतदार याद्याही प्रकाशित केल्या.

"स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्यास सरकार घाबरत आहे. त्यामुळे सामान्य लोकांची फजिती होत आहे. अधिकारी मुजोर झाले आहेत."- रूपेश ढोके, तालुकाध्यक्ष, मनसे

"ग्रामीण भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे."- संजय आवारी, तालुकाध्यक्ष, उद्धवसेना

"सध्या संपूर्ण सूत्रे अधिकाऱ्याच्या हातात आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही." - अविनाश लांबट, तालुकाध्यक्ष, भाजप

"विद्यमान सरकार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याला घाबरत आहे. प्रशासक राजमुळे अधिकारी मुजोर झाले आहे. नागरिकांची कामे अडली आहे." - भारत मत्ते, तालुकाध्यक्ष, राकाँ

"स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षापासून पदाधिकारीच नसल्याने अनेक अडचणी आहेत. कामे कोणाकडून करून घ्यावी, हा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला." - मारोती गौरकार, तालुकाध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ