शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

विधानसभेचा बिगूल वाजणार पण पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:53 IST

निवडणुकीची प्रतीक्षा : प्रशासकराजमुळे गाव विकासकामांना लागला ब्रेक

देवेंद्र पोल्हे लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे दोन, अडीच वर्षांपासून मिनी मंत्रालय म्हणून गावखेड्यात ओळख असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. प्रशासक राजमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असून, गावाच्या विकासालाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मागील दोन वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आलेला आहे. पदाधिकारी नसल्यामुळे अधिकाऱ्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही.

राजकारणी वाट पाहून थकले गावपुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागलेले आहे, परंतु निवडणुकीचा कोणताही अंदाज दिसत नसल्यामुळे तेही आता शांतच बसलेले आहेत.

प्रशासकराज' कधी हटणार विधानसभा निवडणूक निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाल्यावर म्हणजे पुढच्या वर्षी २०२५ मध्ये फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणूक होऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवरील प्रशासक राज हटणार आहे.

विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित 

  • निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती संकलन सुरू केले आहे. 
  • सुधारित मतदान केंद्र बनवून ती घोषित केली आहेत. सोबतच मतदार याद्याही प्रकाशित केल्या.

"स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्यास सरकार घाबरत आहे. त्यामुळे सामान्य लोकांची फजिती होत आहे. अधिकारी मुजोर झाले आहेत."- रूपेश ढोके, तालुकाध्यक्ष, मनसे

"ग्रामीण भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे."- संजय आवारी, तालुकाध्यक्ष, उद्धवसेना

"सध्या संपूर्ण सूत्रे अधिकाऱ्याच्या हातात आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही." - अविनाश लांबट, तालुकाध्यक्ष, भाजप

"विद्यमान सरकार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याला घाबरत आहे. प्रशासक राजमुळे अधिकारी मुजोर झाले आहे. नागरिकांची कामे अडली आहे." - भारत मत्ते, तालुकाध्यक्ष, राकाँ

"स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेल्या दोन-अडीच वर्षापासून पदाधिकारीच नसल्याने अनेक अडचणी आहेत. कामे कोणाकडून करून घ्यावी, हा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला." - मारोती गौरकार, तालुकाध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ