शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आर्णीत पुन्हा एकदा निर्घृण खून, क्षुल्लक वादात तरुणाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : रंगपंचमीच्या दिवशी नाचण्याच्या वादातून एका युवकाला तीन युवकांनी चाकूने भोसकले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील गणपती मंदिर चाैकात घडली. अतिष महादेव ढोले (३०, रा. आर्णी) असे मृत युवकाचे नाव आहे. चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गणपती मंदिर चाैकात त्यांच्यात नाचण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिघांनीही अतिषला चाकूने भोसकले. काही वेळातच अतिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची गर्दी झाली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अतिषला उपचारासाठी रवाना केले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी पळून जात होते. त्यापैकी रोहन मनोज सोयाम हा जमावाच्या हाती लागला. जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणी मृतक अतिषच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. त्यात चाैघांनी आपल्या भावाला मारल्याचे नमूद केले. पोलिसांनी तूर्तास भादंवि ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटकही केली आहे. यातील चाैथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी शुक्रवारी रात्रीच भेट दिली. दरम्यान या घटनेतील आरोपी  चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्णी शहर आणि तालुक्यात खुनाच्या घटना वाढल्या आहे. मानवी नावाच्या चिमुकलीच्या हत्येने सुरू झालेले हे सत्र सुनेने केलेल्या गोळीबारानंतर तरी पोलीस रोखतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून आतापर्यंत तब्बल पाच जणांचा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

खुनाची मालिका सुरूच- आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी