शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

आर्णीत पुन्हा एकदा निर्घृण खून, क्षुल्लक वादात तरुणाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : रंगपंचमीच्या दिवशी नाचण्याच्या वादातून एका युवकाला तीन युवकांनी चाकूने भोसकले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील गणपती मंदिर चाैकात घडली. अतिष महादेव ढोले (३०, रा. आर्णी) असे मृत युवकाचे नाव आहे. चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गणपती मंदिर चाैकात त्यांच्यात नाचण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिघांनीही अतिषला चाकूने भोसकले. काही वेळातच अतिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची गर्दी झाली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अतिषला उपचारासाठी रवाना केले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी पळून जात होते. त्यापैकी रोहन मनोज सोयाम हा जमावाच्या हाती लागला. जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणी मृतक अतिषच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. त्यात चाैघांनी आपल्या भावाला मारल्याचे नमूद केले. पोलिसांनी तूर्तास भादंवि ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटकही केली आहे. यातील चाैथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी शुक्रवारी रात्रीच भेट दिली. दरम्यान या घटनेतील आरोपी  चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्णी शहर आणि तालुक्यात खुनाच्या घटना वाढल्या आहे. मानवी नावाच्या चिमुकलीच्या हत्येने सुरू झालेले हे सत्र सुनेने केलेल्या गोळीबारानंतर तरी पोलीस रोखतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून आतापर्यंत तब्बल पाच जणांचा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

खुनाची मालिका सुरूच- आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी