शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

आर्णी तालुक्याला विजेच्या समस्येने ग्रासले

By admin | Updated: October 27, 2016 01:11 IST

तालुक्याची वीज समस्या गंभीर झाली आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे.

आर्णी : तालुक्याची वीज समस्या गंभीर झाली आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. शिवाय उद्योग व्यवसायही प्रभावीत झाले आहे. या संदर्भात विद्युत कंपनीच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा केव्हा खंडित होईल, याचा नेम राहिलेला नाही. वीज गूल झाल्यानंतर कित्येक तासपर्यंत सुरळीत होत नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. अतिशय कमी वेळ वीज उपलब्ध होत असल्याने नळयोजनेच्या पाण्याच्या टाक्या भरत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय सिंचनावरही अनियमित विजेचा परिणाम होत आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ विजेअभावी पिकांना पाणी देणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात विजेवर चालणारे अनेक उद्योग आहे. अनियमित वीज राहात असल्याने तेही प्रभावीत झाले आहे. अनेक युवकांनी कर्जाऊ रकमा काढून उद्योगाची उभारणी केली आहे. परंतु आवश्यक तेवढी आवक होत नाही. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या रकमांवरील व्याजाचा भरणा करणेही त्यांना जड जात आहे. कमी वेळात आवश्यक तेवढे उत्पादन किंवा काम काढता येत नाही. या शिवाय ग्रामीण भागातील व्यवसायही विजेअभावी अडचणीत आले आहे. विद्युत साहित्य विक्रीची दुकाने, झेरॉक्स सेंटर चालविताना ही समस्या प्रामुख्याने जाणवते. (तालुका प्रतिनिधी)