शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

आर्णी तालुक्याला विजेच्या समस्येने ग्रासले

By admin | Updated: October 27, 2016 01:11 IST

तालुक्याची वीज समस्या गंभीर झाली आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे.

आर्णी : तालुक्याची वीज समस्या गंभीर झाली आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. शिवाय उद्योग व्यवसायही प्रभावीत झाले आहे. या संदर्भात विद्युत कंपनीच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा केव्हा खंडित होईल, याचा नेम राहिलेला नाही. वीज गूल झाल्यानंतर कित्येक तासपर्यंत सुरळीत होत नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. अतिशय कमी वेळ वीज उपलब्ध होत असल्याने नळयोजनेच्या पाण्याच्या टाक्या भरत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय सिंचनावरही अनियमित विजेचा परिणाम होत आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ विजेअभावी पिकांना पाणी देणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात विजेवर चालणारे अनेक उद्योग आहे. अनियमित वीज राहात असल्याने तेही प्रभावीत झाले आहे. अनेक युवकांनी कर्जाऊ रकमा काढून उद्योगाची उभारणी केली आहे. परंतु आवश्यक तेवढी आवक होत नाही. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या रकमांवरील व्याजाचा भरणा करणेही त्यांना जड जात आहे. कमी वेळात आवश्यक तेवढे उत्पादन किंवा काम काढता येत नाही. या शिवाय ग्रामीण भागातील व्यवसायही विजेअभावी अडचणीत आले आहे. विद्युत साहित्य विक्रीची दुकाने, झेरॉक्स सेंटर चालविताना ही समस्या प्रामुख्याने जाणवते. (तालुका प्रतिनिधी)