शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

महागाईविरूद्ध आर्णीत काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे.

ठळक मुद्देशिवनेरी चौकात घोषणाबाजी : भजे तळून केला केंद्र सरकारचा निषेध, अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जवळपास दीड वर्षांपासून कोरोना व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी, यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची तर वाईट परिस्थिती झाली. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे बुधवारी काँग्रेसने येथील शिवनेरी चौकात केंद्र सरकारचा निषेध करीत आंदोलन केले.महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किमतीवर झाला. अत्यावश्यक घरगुती गॅसचे दर ८५० रुपये झाले. आता सबसिडी नाममात्र उरली. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रचार केला. २०१९ च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. मात्र, सध्या खरचं लाभार्थ्यांना महागडा गॅस परवडतो का, असा प्रश्नही उपस्थित केला. खाद्य तेलाचे दर ६ महिन्यात दुप्पट झाले. केंद्र सरकारने खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. तूर डाळ व इतर डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले आहे. गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महागाईचा निषेध करण्याकरिता तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथे निदर्शने केली.आंदोलनात जितेंद्र मोघे, साजीद बेग, आरिज बेग, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, विजय मोघे, छोटू देशमुख, गुणवंत राऊत, सुनील भारती, सभापती विलास अगलधरे, नीता ठाकरे, खुशाल ठाकरे, पंडित बुटले, निलेश बुटले, अनिता भगत, स्मिता वानखडे, रेणुका बोईनवार, वंदना गावंडे, ज्योती मोरकर, ज्योती आरणकर, भाग्यश्री भवरे, कांचन भगत, सुरेखा देमापुरे, अनिल भगत, संजय राऊत, अनंता कांबळे, गजानन काळे, उमेश आचमवार, नालंदा भरणे, तारासिंग राठोड, तन्मय बागूल, सतीश धाये, अलिम देशमुख, यादवराव वंजारी आदी सहभागी होते.

सबसिडी नाममात्र

इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहे. दुसरीकडे सिलिंडरवरील सबसिडी नाममात्र उरल्याचा आरोप काँग्रेसने केला. सिलिंडरचे दर वाढल्याने उज्ज्वला योजनाही कुचकामी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणेही परवडत नाही. त्यामुळे लाभार्थीसुद्धा हवालदिल झाले. केंद्र सरकारला या वाढत्या महागाईबाबत कोणतीही चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन