शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरूद्ध आर्णीत काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे.

ठळक मुद्देशिवनेरी चौकात घोषणाबाजी : भजे तळून केला केंद्र सरकारचा निषेध, अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जवळपास दीड वर्षांपासून कोरोना व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी, यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची तर वाईट परिस्थिती झाली. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे बुधवारी काँग्रेसने येथील शिवनेरी चौकात केंद्र सरकारचा निषेध करीत आंदोलन केले.महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किमतीवर झाला. अत्यावश्यक घरगुती गॅसचे दर ८५० रुपये झाले. आता सबसिडी नाममात्र उरली. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रचार केला. २०१९ च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. मात्र, सध्या खरचं लाभार्थ्यांना महागडा गॅस परवडतो का, असा प्रश्नही उपस्थित केला. खाद्य तेलाचे दर ६ महिन्यात दुप्पट झाले. केंद्र सरकारने खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. तूर डाळ व इतर डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले आहे. गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महागाईचा निषेध करण्याकरिता तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथे निदर्शने केली.आंदोलनात जितेंद्र मोघे, साजीद बेग, आरिज बेग, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, विजय मोघे, छोटू देशमुख, गुणवंत राऊत, सुनील भारती, सभापती विलास अगलधरे, नीता ठाकरे, खुशाल ठाकरे, पंडित बुटले, निलेश बुटले, अनिता भगत, स्मिता वानखडे, रेणुका बोईनवार, वंदना गावंडे, ज्योती मोरकर, ज्योती आरणकर, भाग्यश्री भवरे, कांचन भगत, सुरेखा देमापुरे, अनिल भगत, संजय राऊत, अनंता कांबळे, गजानन काळे, उमेश आचमवार, नालंदा भरणे, तारासिंग राठोड, तन्मय बागूल, सतीश धाये, अलिम देशमुख, यादवराव वंजारी आदी सहभागी होते.

सबसिडी नाममात्र

इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहे. दुसरीकडे सिलिंडरवरील सबसिडी नाममात्र उरल्याचा आरोप काँग्रेसने केला. सिलिंडरचे दर वाढल्याने उज्ज्वला योजनाही कुचकामी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणेही परवडत नाही. त्यामुळे लाभार्थीसुद्धा हवालदिल झाले. केंद्र सरकारला या वाढत्या महागाईबाबत कोणतीही चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन