शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

महागाईविरूद्ध आर्णीत काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे.

ठळक मुद्देशिवनेरी चौकात घोषणाबाजी : भजे तळून केला केंद्र सरकारचा निषेध, अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जवळपास दीड वर्षांपासून कोरोना व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी, यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची तर वाईट परिस्थिती झाली. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे बुधवारी काँग्रेसने येथील शिवनेरी चौकात केंद्र सरकारचा निषेध करीत आंदोलन केले.महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किमतीवर झाला. अत्यावश्यक घरगुती गॅसचे दर ८५० रुपये झाले. आता सबसिडी नाममात्र उरली. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रचार केला. २०१९ च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. मात्र, सध्या खरचं लाभार्थ्यांना महागडा गॅस परवडतो का, असा प्रश्नही उपस्थित केला. खाद्य तेलाचे दर ६ महिन्यात दुप्पट झाले. केंद्र सरकारने खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. तूर डाळ व इतर डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले आहे. गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महागाईचा निषेध करण्याकरिता तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथे निदर्शने केली.आंदोलनात जितेंद्र मोघे, साजीद बेग, आरिज बेग, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, विजय मोघे, छोटू देशमुख, गुणवंत राऊत, सुनील भारती, सभापती विलास अगलधरे, नीता ठाकरे, खुशाल ठाकरे, पंडित बुटले, निलेश बुटले, अनिता भगत, स्मिता वानखडे, रेणुका बोईनवार, वंदना गावंडे, ज्योती मोरकर, ज्योती आरणकर, भाग्यश्री भवरे, कांचन भगत, सुरेखा देमापुरे, अनिल भगत, संजय राऊत, अनंता कांबळे, गजानन काळे, उमेश आचमवार, नालंदा भरणे, तारासिंग राठोड, तन्मय बागूल, सतीश धाये, अलिम देशमुख, यादवराव वंजारी आदी सहभागी होते.

सबसिडी नाममात्र

इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहे. दुसरीकडे सिलिंडरवरील सबसिडी नाममात्र उरल्याचा आरोप काँग्रेसने केला. सिलिंडरचे दर वाढल्याने उज्ज्वला योजनाही कुचकामी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणेही परवडत नाही. त्यामुळे लाभार्थीसुद्धा हवालदिल झाले. केंद्र सरकारला या वाढत्या महागाईबाबत कोणतीही चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन