शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत चणा खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : नाफेडकडून शेतकऱ्यांना खरेदीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यात यावर्षी साडेतीन हजार हेक्टरवर चण्याचे उत्पादन घेण्यात आले. मात्र नाफेडने चणा खरेदी सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे. नाफेडने हरभऱ्याला प्रतिक्विंटल चार हजार ८७५ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र खरेदी सुरू न केल्याने चणा उत्पादकांना खुल्या बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे.खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल हजार ते १२०० रुपयांनी कमी मिळत आहे. त्यात यावर्षी लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बाजारपेठ बंद होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही इतर शेतमालाची शासनाने खरेदी सुरू केली.चणा खरेदीसाठी मात्र कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्याच्या घरात हरभरा साठवून आहे. १५ जूननंतर चण्याची खरेदी सुरू होईल, असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी आर्थिक तजवीज करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.२१०० शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणीतालुक्यातील दोन हजार १०० शेतकऱ्यांनी चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. आजच्या घडीलासुद्धा नोंदणी सुरूच आहे. मात्र खरेदी नेमकी कधी सुरू होणार, याबाबत यंत्रणा काहीही सांगण्यास तयार नाही. परिणामी शेतकऱ्यांना पडेल भावाने चणा विक्री करावी लागणार आहे. आवक कमी झाल्यानंतर नाफेड खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे. यात शेतकरी वेठीस धरला जात आहे. चणा निघून दोन महिने झाल्यानंतरही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. या संकट काळात शासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड