शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:16 PM

आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणाची माहिती : पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, युद्धपातळीवर काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणी आणण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर केली. ३०२ कोटी रूपये खर्चाची अमृत योजना ३० महिन्यांत पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ पर्यंत यवतमाळात पाणी पोहोचणार होते. तथापि यावर्षीची पाणीटंचाई लक्षात घेऊन येत्या मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्रयत्न आहे.बेंबळा ते टाकळी फाटापर्यंत तब्बल १९.७५ किलोमीटरची एक हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आर्यन पाईपलाईन जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यत आणली जात आहे. या पाईपसाठी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरण कंत्राटदाराला ६० टक्के रक्कम अदा करीत होते. मात्र आता पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभागाने पाईपसाठी जीवन प्राधिकरणाकडून १०० टक्के निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले.१८ टक्के कामानंतर पंपिंगचे टेंडर५० टक्के नागरी काम झाल्याशिवाय पंपिंग मशीनची निविदा काढता येत नाही. मात्र पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष तरतूद म्हणून केवळ १८ टक्के नागरी काम झाल्यास पंपिंग मशीनची निविदा काढण्यासाठी पाठपुरावा केला. परिणामी जीवन प्राधिकरणाने बेंबळावर ५५० हॉर्स पॉवरचे ४ पंपिंग मशीन आणि टाकळी येथील फिल्टर प्लाँटवर २०० हॉर्स पॉवरच्या ४ पंपिंग मशीनच्या निविदा काढण्यास मंजुरी दिल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी दिली.