शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला. बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते.

ठळक मुद्देदिवस परीक्षेचे : तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले उत्तरपत्रिका लिहिण्याचे सोपे उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, पण दहावीचे विद्यार्थी ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावी म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांनी दिला.दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला.बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षरे, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे लेखनकौशल्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरजआजपासून विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षाराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यंदा जिल्ह्यातील ४४ हजार १७० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहे. १५६ केंद्रांवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. शिक्षण विभागाचे ५ आणि डायटचे १ भरारी पथक कॉपीमुक्त परीक्षेसाठी लक्ष ठेवणार आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.उत्तरपत्रिका हाती येताच पहिल्यांदा संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यावी. अनेकदा उत्तरपत्रिकेचे धागे निसटलेले असतात. अशी उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचावे. उत्तरे लिहितांना वारंवार खाडाखोड करू नये. त्यासाठी खात्री असलेले प्रश्न आधी सोडवावे. त्यामुळे पेपर तपासणाऱ्यावर चांगले ‘इम्प्रेशन’ पडेल. शेवटच्या दहा मिनिटा आपण सोडविलेली उत्तरे पुन्हा तपासून दुरुस्त करावी, काही राहून गेलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.- डॉ. प्रशांत गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, यवतमाळअक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात.उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरपणा महत्त्वाचा असून परीक्षेत सलग लेखनाचा वेग कायम ठेवावा.परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा उत्तम सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी.परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक करावा.उत्तरलेखनात कृत्रिम किंवा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावी.शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावी. प्रश्न काळजीपूर्वक वाचावे. लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा.सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी, खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहित आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.

टॅग्स :Studentविद्यार्थी