शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला. बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते.

ठळक मुद्देदिवस परीक्षेचे : तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले उत्तरपत्रिका लिहिण्याचे सोपे उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, पण दहावीचे विद्यार्थी ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावी म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांनी दिला.दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नंतर प्रत्येक पानागणिक बेढब होत जातो. त्यामुळे लिखाणाची गती शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा सल्ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिला.बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षरे, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे लेखनकौशल्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरजआजपासून विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षाराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यंदा जिल्ह्यातील ४४ हजार १७० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहे. १५६ केंद्रांवर शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. शिक्षण विभागाचे ५ आणि डायटचे १ भरारी पथक कॉपीमुक्त परीक्षेसाठी लक्ष ठेवणार आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.उत्तरपत्रिका हाती येताच पहिल्यांदा संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यावी. अनेकदा उत्तरपत्रिकेचे धागे निसटलेले असतात. अशी उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचावे. उत्तरे लिहितांना वारंवार खाडाखोड करू नये. त्यासाठी खात्री असलेले प्रश्न आधी सोडवावे. त्यामुळे पेपर तपासणाऱ्यावर चांगले ‘इम्प्रेशन’ पडेल. शेवटच्या दहा मिनिटा आपण सोडविलेली उत्तरे पुन्हा तपासून दुरुस्त करावी, काही राहून गेलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.- डॉ. प्रशांत गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, यवतमाळअक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात.उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरपणा महत्त्वाचा असून परीक्षेत सलग लेखनाचा वेग कायम ठेवावा.परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा उत्तम सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी.परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक करावा.उत्तरलेखनात कृत्रिम किंवा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावी.शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावी. प्रश्न काळजीपूर्वक वाचावे. लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा.सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी, खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहित आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.

टॅग्स :Studentविद्यार्थी