शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मजिप्रा'मध्ये पुन्हा ५१ सहायक अभियंत्यांच्या पदोन्नतीचा लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:45 IST

उपविभागीय अभियंता होणार : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागितले अहवाल

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या दणक्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीतून भरली जात आहे. याआधी ४३ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. आता ५१ सहायक अभियंत्यांच्या पदोन्नतीचा लॉट काढला जाणार आहे. त्यांना उपविभागीय अभियंता या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात मागील २० वर्षांत पदोन्नतीने किंवा इतर पद्धतीने पदभरती करण्यात आलेली नाही. प्रभारीच्या भरवशावर कारभार चालविला जात आहे. अधीक्षक अभियंत्याचा पदभार कार्यकारी अभियंत्याकडे सोपविण्यात आलेला आहे. कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी उपविभागीय अभियंत्यावर देण्यात आलेली आहे. सहायक अभियंते उपविभागीय अभियंत्याचा कारभार पाहात आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना आणि पाणीपट्टी वसुलीवर होत आहे.

यासंदर्भात 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने तत्काळ दखल घेतली. त्यानंतर प्राधिकरणाने १२ उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म्हणून बढती दिली. ३१ शाखा अभियंत्यांना उपविभागीय अभियंत्यांना पदोन्नती दिली. आता ५१ सहायक अभियंत्यांना पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मजिप्राच्या पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील सहायक अभियंत्यांची निवड सूची तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना देण्यात आलेले आहे.

पदोन्नतीसाठी मागितलेली माहिती

सहायक अभियंत्यांना उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती देण्याकरिता संबंधितांची इत्थंभूत माहिती मागविली जात आहे. त्यामध्ये जातीचा संवर्ग, जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे काय, मराठी, हिन्दी, विभागीय, संगणक परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे काय. विभागीय चौकशी सुरू अथवा प्रस्तावित आहे काय, पोलिसांत गुन्हा अथवा न्यायालयीन प्रकरण आहे काय, दीर्घकाळ विना परवानगीने गैरहजर आहे काय आदी प्रकारची माहिती गोळा केली जात आहे.

यवतमाळ विभाग प्रतीक्षेत

यवतमाळ येथील उपविभागीय अभियंता पदाचा कारभार शाखा अभियंत्यांकडे आहे. महिनाभरापूर्वी ३१ शाखा अभियंत्यांना उपविभागीय अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली. यातून यवतमाळला उपविभागीय अभियंता मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यावर पाणी फेरले गेले. आता होणाऱ्या पदोन्नतीतून तरी यवतमाळला न्याय मिळेल, अशी आशा केली जात आहे. यवतमाळ येथे ३०२ कोटींच्या अमृत पाणीपुरवठासह भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामांवर नियंत्रणासाठी पूर्णवेळ उपविभागीय अभियंत्यांची आवश्यकता सांगितली जात आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYavatmalयवतमाळ