शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

जिल्हा परिषदेमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:17 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर्षभरापासून मुद्दा उपस्थित करूनही प्रशासनाकडून अनुपालन मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्षांनी सर्व सदस्यांना तातडीने अनुपालन देण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देस्थायी समिती : सभेची नोटीसच नाही, प्रश्नही सुटत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी सभेची नोटीस न मिळाल्याबद्दल संताप व्यक्त केला. काही सदस्यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर्षभरापासून मुद्दा उपस्थित करूनही प्रशासनाकडून अनुपालन मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्षांनी सर्व सदस्यांना तातडीने अनुपालन देण्याचे निर्देश दिले. स्थायी समिती सदस्यांनाच अनुपालन मिळत नसेल तर सामान्य सदस्यांचे काय, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सर्वसामान्य सदस्यांना तीन महिन्यानंतर सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडण्याची संधी मिळते. आमचेच प्रश्न सुटत नसतील तर सामान्य सदस्यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न सदस्यांनी विचारला.सभेत ११ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत माहिती देण्यात आली. आसोला येथे आतापर्यंत किडणीच्या आजाराने २० जण दगावले. त्यानंतरही माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तेथे जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. मंगला पावडे यांनी अनेक गावांमध्ये अस्वच्छता असून ग्रामपंचायत त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.तेजापूर येथे डॉक्टर नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. समस्या सुटत नसल्याने लोकं आम्हाला जोडे मारतील, असा संताप त्यांनी व्यक्त केला. पेसा ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. मात्र त्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक ठिकाणी अफरातफर होते. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली.आता व्हॅटस्अ‍ॅपवर चालणार कामकाजसभेत स्थायी समिती सदस्यांचा व संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॅटस्अ‍ॅप ग्रुप स्थापन करण्याची संकल्पना समोर आली. त्यावर सदस्यांना उत्तरे दिली जाणार आहे. यामुळे यापुढे स्थायी समितीचे कामकाज व्हॅटस्अ‍ॅप ग्रुपवर चालणार आहे. मात्र अनेक सदस्य दुर्गम भागात वास्तव्याला असतात. तेथे नेटसेवा उपलब्ध नसल्याने या ग्रुपचा फज्जा उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सभेत ४६१ अधिक २६७ गावांमध्ये स्मशानभूमी शेड बांधण्यावरह चर्चा झाली. संबंधित ग्रामपंचायतींना तीन लाख ६५ हजार रुपयात शेड बांधण्याचे निर्देश दिले जाणार आहे. तसेच पंचायत समितीची आठ वाहने निर्लेखित करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. मात्र जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे शिक्षकांच्या समुपदेशनाच्या बाबीवर चुप्पी साधली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद