शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सेतू केंद्रात अलोट गर्दी

By admin | Updated: June 21, 2014 02:09 IST

येथील सेतू केंद्रात अर्ज स्विकृतीसाठी एकच खिडकी असल्याने अलोट गर्दी होत आहे़

वणी : येथील सेतू केंद्रात अर्ज स्विकृतीसाठी एकच खिडकी असल्याने अलोट गर्दी होत आहे़ केवळ अर्ज देण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे रहावे लागते. मात्र महसूल प्रशासन नागरिकांचे हाल उघड्या डोळ्यांनी बघत असून त्यावर कोणतीही उपायोजना करायला तयार नाही़ याबाबत कोणता पक्ष किंवा संघटनाही आवाज काढायला पुढे सरसावत नाही़नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले. विद्यार्थ्यांना शाळा, महविद्यालय प्रवेशासाठी विविध कागदपत्रांची गरज आहे़ ही सर्व प्रमाणपत्रे तहसील कार्यालयातूनच काढावी लागतात़ त्यासाठी सेतू केंद्रात अर्ज करावे लागतात़ मात्र येथे अर्ज स्विकृतीसाठी एकच टेबल लावण्यात आला. त्यामुळे नागरिकांना केवळ अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो़ किमान दोन महिन्यासाठी महसूल विभागाने अर्ज स्विकृतीसाठी जादा व्यवस्था करणे आवश्यक आहे़सातबारा, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला यासाठी एक टेबल व जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर, राष्ट्रयीत्वाचे प्रमाणपत्र, यासाठी एक टेबल अशी व्यवस्था करण्याची नित्तांत गरज आहे़ खासगी सेतू केंद्रात चारपटीने अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांची लूट होत आहे़ प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर १५ दिवस प्रमाणपत्र मिळत नाही़ परिणामी काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे़ कोणत्या प्रमाणपत्रांसाठी कोणती कागदपत्रे जोडावी, याचा फलक सेतू केंद्राबाहेर लावण्यात आला आहे़ मात्र अर्ज स्विकारताना यादीपेक्षाही अधिक कागदपत्रे मागितली जात आहे. त्यामुळे नागरिकांची ऐनवेळी तारांबळ उडत आहे.यासाठी महसूल विभागाने आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी होत आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जाणाऱ्या केसेसमध्ये तर त्रृटी काढण्याचा सपाटाच सुरू आहे़ लहान-सहान त्रृटी काढून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याकडे या विभागाचा कल वाढला आहे़ शासनाचा सेतू केंद्र स्थापन करण्याचा उद्देश बाजूला राहिला असून सेतू केंद्र नागरिकांना लुटण्याचा अड्डा बनला की काय ? असे वाटायला लागले आहे़ प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अर्जाचे नमुने तहसील परिसरातच चढ्या दराने विकून नागरिकांना लुबाडले जात आहे़ नागरिकांच्या या हालअपेष्टांकडे लक्ष द्यायला महसूल अधिकाऱ्यांना सवड का मिळत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ आता जिल्हाधिकाऱ्यांनी तरी या बाबींकडे लक्ष देऊन जनतेला त्रासातून मुक्त करावे, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)