शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील सर्व एटीएम झाले कॅशलेस

By admin | Updated: May 16, 2017 01:36 IST

वणी शहरात विविध बँकांचे २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एटीएममध्ये कॅश नसल्याने व्यवहार प्रभावित झाले आहेत.

व्यवहार प्रभावित : ऐन लग्नसराई व शेती हंगामाच्या तोंडावर चलन तुटवडालोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात विविध बँकांचे २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एटीएममध्ये कॅश नसल्याने व्यवहार प्रभावित झाले आहेत. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी दररोज बँकापुढे पुन्हा एकदा रांगा लागत आहेत. वणीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना सामान्य नागरिकांना भर उन्हात रक्कम काढण्यासाठी बँकापुढे रांगेत उभे राहावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असून लवकरच शेती हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना पैशाची गरज पडते. मात्र बँकांमधून पैसेच मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची घोषणा अचानक केली. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. नोटाबंदीनंतर अनेक महिने नागरिकांना रक्कम मिळविण्यासाठी झुंजावे लागले. ५० दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असेही त्यावेळी पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. मात्र सहा महिने लोटूनही ही समस्या सुटली नाही. मध्यंतरी परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. एटीएममधून समाधानकारक रक्कम काढता येत होती. मात्र ही अवस्था औटघटकेची ठरली. दर चार दिवसांनी एटीएममध्ये ठणठणाट निर्माण होत आहे. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना ‘नो कॅश’ चा फलक वाचून परत यावे लागत आहे. शहरातील काही बँकांमधून ग्राहकांना १० हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात आहे. गरज अधिक रकमेची असताना १० हजारांत व्यवहार कसा करावा, असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे. सध्या लग्नसराई असून अनेक कु टुंबांमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लग्न म्हटले की, खर्चासाठी पैसे हवे असतात. परंतु एटीएममध्ये ठणठणाट असल्याने आवश्यक रक्कम मिळत नसल्याने लग्न घरीही पैशाची अडचण निर्माण झाली आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर होणार असल्याने नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, रासायनिक खते यासह शेतीसाठी आवश्यक साधनेही शेतकऱ्यांना खरेदी करावी लागतात. यासाठी पैशाची गरज असते. परंतु बँकांमधून आवश्यक रक्कमच मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन हंगामात शेतकऱ्यांना पैशासाठी कुणापुढे तरी हात पसरावे लागत आहे. नोटाबंदीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वणी शहरात किमान २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकात रांगा लावण्याची गरज पडू नये म्हणून एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सेवा आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआयकडूनच बँकांना अपुरा चलन पुरवठाराष्ट्रीयकृत बँकांना नागपूर येथील भारतीय रिझर्व बँकेकडून चलन पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अपुरा चलन पुरवठा होत आहे. जेथे दररोज किमान २५ लाख रुपयांची गरज असते, तेथे केवळ पाच लाख रुपयांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे स्टेट बँकेचे येथील व्यवस्थापक अतुल देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.