शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वणीतील सर्व एटीएम झाले कॅशलेस

By admin | Updated: May 16, 2017 01:36 IST

वणी शहरात विविध बँकांचे २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एटीएममध्ये कॅश नसल्याने व्यवहार प्रभावित झाले आहेत.

व्यवहार प्रभावित : ऐन लग्नसराई व शेती हंगामाच्या तोंडावर चलन तुटवडालोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरात विविध बँकांचे २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एटीएममध्ये कॅश नसल्याने व्यवहार प्रभावित झाले आहेत. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी दररोज बँकापुढे पुन्हा एकदा रांगा लागत आहेत. वणीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना सामान्य नागरिकांना भर उन्हात रक्कम काढण्यासाठी बँकापुढे रांगेत उभे राहावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असून लवकरच शेती हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना पैशाची गरज पडते. मात्र बँकांमधून पैसेच मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची घोषणा अचानक केली. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. नोटाबंदीनंतर अनेक महिने नागरिकांना रक्कम मिळविण्यासाठी झुंजावे लागले. ५० दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असेही त्यावेळी पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. मात्र सहा महिने लोटूनही ही समस्या सुटली नाही. मध्यंतरी परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. एटीएममधून समाधानकारक रक्कम काढता येत होती. मात्र ही अवस्था औटघटकेची ठरली. दर चार दिवसांनी एटीएममध्ये ठणठणाट निर्माण होत आहे. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना ‘नो कॅश’ चा फलक वाचून परत यावे लागत आहे. शहरातील काही बँकांमधून ग्राहकांना १० हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात आहे. गरज अधिक रकमेची असताना १० हजारांत व्यवहार कसा करावा, असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे. सध्या लग्नसराई असून अनेक कु टुंबांमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लग्न म्हटले की, खर्चासाठी पैसे हवे असतात. परंतु एटीएममध्ये ठणठणाट असल्याने आवश्यक रक्कम मिळत नसल्याने लग्न घरीही पैशाची अडचण निर्माण झाली आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर होणार असल्याने नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, रासायनिक खते यासह शेतीसाठी आवश्यक साधनेही शेतकऱ्यांना खरेदी करावी लागतात. यासाठी पैशाची गरज असते. परंतु बँकांमधून आवश्यक रक्कमच मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन हंगामात शेतकऱ्यांना पैशासाठी कुणापुढे तरी हात पसरावे लागत आहे. नोटाबंदीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून अद्यापही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वणी शहरात किमान २० पेक्षा अधिक एटीएम आहेत. बहुतांश एटीएम हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना बँकात रांगा लावण्याची गरज पडू नये म्हणून एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सेवा आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआयकडूनच बँकांना अपुरा चलन पुरवठाराष्ट्रीयकृत बँकांना नागपूर येथील भारतीय रिझर्व बँकेकडून चलन पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अपुरा चलन पुरवठा होत आहे. जेथे दररोज किमान २५ लाख रुपयांची गरज असते, तेथे केवळ पाच लाख रुपयांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे स्टेट बँकेचे येथील व्यवस्थापक अतुल देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.