शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मद्यपींनी रिचविली दीड कोटी लिटर दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

शासनाला महसूल गोळा करून देणाऱ्या प्रमुख तीन खात्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो. विकासासाठी लागणारा निधी राजकोषात टाकण्याची जबाबदारी या विभागावर आहे. अर्थातच हा राजकोष भरण्यासाठी दारू विक्री व खरेदीदार यांचा हातभार लागतो. जिल्ह्यात देशी दारूचे ठोक विक्रेते ११, किरकोळ विक्रेते १२९, विदेशी दारूचे ठोक विक्रेते तीन, किरकोळ विक्रेते २५ आहेत.

ठळक मुद्देआठ महिन्यांची आकडेवारी : शासनाला ३० कोटी ६८ लाखांचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘पिने वालों को पिने का बहाना चाहिये’ हा बहाणा यवतमाळातील तळीरामांनी प्रत्येकवेळी शोधलाच असे स्पष्ट होते. याला आधार राज्य उत्पादन शुक्ल विभागाने आठ महिन्यात विक्री झालेल्या दारूच्या अहवालाचा आहे. २७ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान तब्बल एक कोटी ४२ लाख ८० हजार ६९७ लिटर दारूची विक्री झाली आहे. यात देशी, विदेशी, बिअर अशा सर्व प्रकारच्या मद्यांचा समावेश आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तळीरामांनी दीड कोटी लिटर दारू रिचविल्याची नोंद आहे.शासनाला महसूल गोळा करून देणाऱ्या प्रमुख तीन खात्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो. विकासासाठी लागणारा निधी राजकोषात टाकण्याची जबाबदारी या विभागावर आहे. अर्थातच हा राजकोष भरण्यासाठी दारू विक्री व खरेदीदार यांचा हातभार लागतो. जिल्ह्यात देशी दारूचे ठोक विक्रेते ११, किरकोळ विक्रेते १२९, विदेशी दारूचे ठोक विक्रेते तीन, किरकोळ विक्रेते २५ आहेत. याशिवाय २६२ बिअर बार, ५७ बिअर शॉपी यांचा समावेश आहे. हा परवान्यावर असणारा दारूचा अधिकृत व्यवहार आहे. एप्रिल ते नोव्हेंअर अखेरपर्यंत ९९ लाख ७८ हजार ८२१ लिटर देशी दारूची विक्री झाली. २४ लाख २० हजार ९३९ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. १८ लाख ८१ हजार २०२ लिटर बिअरची विक्री झाली. दारूच्या किमतीत सातत्याने वाढत असल्या तरी विक्रीही वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विदेशी दारूचा खप १४ टक्क्यांनी वाढला आहे. देशी दारूचा खप पाच टक्क्यांनी, तर बिअरचा खप सात टक्क्याने वाढला आहे.बाजारात परवाना व महसूल देणारीच दारू विकली जावी यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाचे आहे. पिणाऱ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हितकारक असेल अशीच दारू विक्री व्हावी याकरिता यंत्रणा काम करते. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी अवैध दारू गुत्ते आहेत. त्याची आकडेवारी कुठेच नाही. तो आकडा मिळाल्यास जिल्ह्यातील तळीरामांनी वर्षभरात किती दारू रिचविली हे स्पष्ट होणार आहे. एकंदर राज्य उत्पादन शुल्क विभागाचाच आकडा सामाजिकदृष्ट्या चिंतन करायला लावणारा आहे. दीड कोटी लिटर दारू आठ महिन्यात पिऊन तर्रर्र होणे तसे बघता शोभनीय नाही.दारूला सामाजिक मान्यता नसली तरी व्यवहारात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दारूच्या वाढत्या विक्रीतून महसूल मिळत असला तरी दुसरीकडे सामाजिक समस्याही तितक्याच मोठ्या प्रमाणात उभ्या ठाकत आहे. मात्र दारूबंदी हा यावरचा उपाय ठरू शकत नाही.दारूबंदी जिल्ह्याचा भारही यवतमाळातील परवान्यावरदारूबंदी हा दारू पिणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी उपाय ठरू शकत नाही, हे चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली येथील दारूबंदीवरून सिद्ध झाले आहे. तेथे पूर्वी दुकानात मिळणारी दारू आता घराघरात व पानटपऱ्यांवर पोहोचली आहे. वर्धा, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना यवतमाळातूनच मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा होतो. या दारू तस्करीमध्ये राजकीय पुढाऱ्यांसह सक्रिय गुन्हेगार व अनेकांनी आपली गुंतवणूक केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचाही वापर दारू पोहोचविण्यासाठी होत असल्याचे अनेक कारवायातून उघड झाले आहे.५२ कोटी ९२ लाख महसुलाचे उद्दिष्टजिल्ह्याला मार्च २०२० पर्यंत ५२ कोटी ९२ लाख महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट शासनस्तरावरून मिळाले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. याची सरासरी ५७.९७ टक्के इतकी आहे. अजून चार महिने शिल्लक आहेत. या कालावधीत महसुलाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग काम करीत आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा