शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांवर आले संकट

By admin | Updated: February 7, 2016 00:44 IST

शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘सेस’ बुडणार : शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची मुभावणी : शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बाजार समित्यावर गंडांतर येणार असून बाजार समित्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट कोसळणार आहे.शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीमार्फतच विकण्याची सक्ती शेतमाल पणन व विनियमन कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या व्यवहारातून बाजार समितीला विक्री मूल्यांवर ‘सेस’ मिळतो. सेसच्या या उत्पन्नातून बाजार समितीचा आर्थिक डोलारा उभारला जातो. प्रत्येक बाजार समितीमध्ये सचिव, लेखापाल, लिपीक, शिपाई, पहारेदार, असे आठ-दहा कर्मचारी सेवेत आहे. त्यांचे वेतनही ‘सेस’च्या उत्पन्नातूनच केले जाते. तसेच बाजार समितीमार्फत शेतमालाची विक्री होत असल्याने अनेक अडते, मापारी, हमाल यांचा उदरनिर्वाह त्याच भरवशावर होत आहे. अनेक बाजार समित्यांनी सेसच्या उत्पन्नातून आपला विकास करून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र शासनाने चार वर्षांपूर्वी काही ठिकाणी खासगी बाजार समित्या उघडण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांना स्पर्धात्मक संधी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ न होता व्यापाऱ्यांनाच रान मोकळे झाल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासूनच शासकीय बाजार समित्यांना घरघर लागली आहे. व्यापाऱ्यांनी शासकीय बाजार समितीकडे पाठ फिरवून खासगी बाजार समितीशी सांगड जमवून खरेदीचे व्यवहार सुरू केले. परिणामी शासकीय बाजार समितीचे उत्पन्न एवढे खाली घसरले, की कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची वेळ शासकीय बाजार समित्यांवर आली आहे. आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपला माल विकण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे शासकीय व खासगी दोन्ही बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या स्वैराचारी खरेदीमुळे शेतकऱ्यांची लूबाडणूक होण्याची शक्यताही बळावली आहे. बाजार समितीमधील कर्मचारी, अडते, मापारी यांचे संसार उघड्यावर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने आता बाजार समित्यांना वेतन अनुदान सुरू करावे व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यामधून द्यावे किंवा कर्मचाऱ्यांना इतर विभागात सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बाजार समित्यांनी उत्पन्नाचे स्रोत शोधणे गरजेचेप्रत्येक शासकीय बाजार समितीकडे स्थावर मालमत्ता आहे. यामधील काही मालमत्ता विकून त्यामधून उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधण्याची वेळ बाजार समित्यांवर येणार आहे. बाजार समित्यांनी गोदामे, मंगल कार्यालये, व्यावसायीक गाळे, स्वत:ची शेतमाल खरेदी, यासारखे उत्पन्नाचे स्रोत तयार करून आपले अस्तित्व टिकविण्याची गरज आहे. सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने यावर चिंतन करणे अपरिहार्य झाले आहे. अन्यथा बाजार समित्याच नष्ट होण्याची भीती आहे.