शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांवर आले संकट

By admin | Updated: February 7, 2016 00:44 IST

शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘सेस’ बुडणार : शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची मुभावणी : शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बाजार समित्यावर गंडांतर येणार असून बाजार समित्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट कोसळणार आहे.शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीमार्फतच विकण्याची सक्ती शेतमाल पणन व विनियमन कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या व्यवहारातून बाजार समितीला विक्री मूल्यांवर ‘सेस’ मिळतो. सेसच्या या उत्पन्नातून बाजार समितीचा आर्थिक डोलारा उभारला जातो. प्रत्येक बाजार समितीमध्ये सचिव, लेखापाल, लिपीक, शिपाई, पहारेदार, असे आठ-दहा कर्मचारी सेवेत आहे. त्यांचे वेतनही ‘सेस’च्या उत्पन्नातूनच केले जाते. तसेच बाजार समितीमार्फत शेतमालाची विक्री होत असल्याने अनेक अडते, मापारी, हमाल यांचा उदरनिर्वाह त्याच भरवशावर होत आहे. अनेक बाजार समित्यांनी सेसच्या उत्पन्नातून आपला विकास करून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र शासनाने चार वर्षांपूर्वी काही ठिकाणी खासगी बाजार समित्या उघडण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांना स्पर्धात्मक संधी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ न होता व्यापाऱ्यांनाच रान मोकळे झाल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासूनच शासकीय बाजार समित्यांना घरघर लागली आहे. व्यापाऱ्यांनी शासकीय बाजार समितीकडे पाठ फिरवून खासगी बाजार समितीशी सांगड जमवून खरेदीचे व्यवहार सुरू केले. परिणामी शासकीय बाजार समितीचे उत्पन्न एवढे खाली घसरले, की कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची वेळ शासकीय बाजार समित्यांवर आली आहे. आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपला माल विकण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे शासकीय व खासगी दोन्ही बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या स्वैराचारी खरेदीमुळे शेतकऱ्यांची लूबाडणूक होण्याची शक्यताही बळावली आहे. बाजार समितीमधील कर्मचारी, अडते, मापारी यांचे संसार उघड्यावर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने आता बाजार समित्यांना वेतन अनुदान सुरू करावे व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यामधून द्यावे किंवा कर्मचाऱ्यांना इतर विभागात सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बाजार समित्यांनी उत्पन्नाचे स्रोत शोधणे गरजेचेप्रत्येक शासकीय बाजार समितीकडे स्थावर मालमत्ता आहे. यामधील काही मालमत्ता विकून त्यामधून उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधण्याची वेळ बाजार समित्यांवर येणार आहे. बाजार समित्यांनी गोदामे, मंगल कार्यालये, व्यावसायीक गाळे, स्वत:ची शेतमाल खरेदी, यासारखे उत्पन्नाचे स्रोत तयार करून आपले अस्तित्व टिकविण्याची गरज आहे. सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने यावर चिंतन करणे अपरिहार्य झाले आहे. अन्यथा बाजार समित्याच नष्ट होण्याची भीती आहे.