शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

खाण पट्ट्यात शेतीचे झाले तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.

ठळक मुद्देवेकोलिची हेकेखोरी : शेतात साचले कंबरभर पाणी, कपाशी बुडाली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील खाणपट्यातील शेतकऱ्यांना वेकोलिच्या हेकेखोरीचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी वेकोलिने चुकीच्या पद्धतीने मातीचे डंपींग करून मातीचे ढिगारे उभारल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.निलजई येथील कोळसा खाणीच्या चुकीच्या माती डंपींगमुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचले असून शेताला आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतांमध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले असून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यामध्ये उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आले असून ही पिके आता उद्ध्वस्त झाली आहेत.वणी तालुक्यातील अहेरी, जुनाडा, पिंपळगाव, निलजई, तरोडा, निवली, बोरगाव, कोलगाव, मुंगोली, चिखली टाकळी या भागातही हिच परिस्थिती आहे. वेकोलिने ढिगारे उभे करताना पर्यावरणाचे सारेच नियम पायदळी तुडविले आहेत. ज्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. शेती केली, तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पिक घेता येत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तक्रारी करूनही वेकोलिचे कानावर हातवेकोलिच्या मग्रुरीने खाण पट्टयातील शेतकरी कमालिचे त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी वारंवार तक्रारी करतात. परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या हंगामात खाणपट्टयातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. वेकोलिने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उकणीच्या माजी सरपंच संगीता खाडे यांनी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती