शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.

ठळक मुद्देउभ्या पिकांची सुरक्षा धोक्यात : वाघाची दहशत अद्यापही कायमच

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील सुन्ना या गावातील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतातील बांधावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला करून त्याला ठार कले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. घटना होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतात जायला कुणीही धजावत नसून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.दरवर्षी शेतातील पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे नुकसान होते. वन्यप्राणी शेतात केव्हा शिरेल व केव्हा हल्ला करेल, याचा नेमच राहिला नाही. आता तर चक्क पट्टेदार वाघ जंगलाच्या बाहेर निघून शेतात शिरत आहे. गुरूवारी सुन्ना येथील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतात धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला केला, हे दृष्य पाहून शेतात असलेले मजूर घाबरून गेले. हा थरार काहीजणांनी आपल्या मोबाईल कॅमेºयातही कैद केला.पांढरकवडापासून ११ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सुन्ना या गावात या अभयारण्यामध्ये एक मुख्य प्रवेशद्वार आहे. याच परिसरातून अभयारण्यालगत प्रविण बोळकुंटवार यांचे शेत आहे. बुधवारी महिला मजूर त्यांच्या शेतात काम करीत असतानाच वाघाने हल्ला केल्यानंतर या महिला अतिशय भयभीत झाल्या आहेत. अद्यापही स्वत:च्या डोळ्याने पाहिलेला थरार त्या विसरल्या नाही.तेव्हापासून त्या शेतातही गेल्या नसल्याची माहिती सुन्ना येथील ग्रामस्थांनी दिली. सुन्ना व परिसरातील शेतकरी अद्यापही वाघाच्या दहशतीतच असून शेतीची संपूर्ण कामे ठप्प पडली आहेत. काही शेतकऱ्यांचे तुरीचे पीक अद्यापही काढायचे असून वाघाच्या दहशतीमुळे कोणीही शेतात जायला तयार नाही. गहू-हरभरा या पिकाची रखवाली करणे, तर सोडाच परंतु शेताकडेच फिरकायला कोणी तयार नाही.२६ फेब्रुवारीपासून तळ ठोकून होती वाघिण४गेल्या बुधवारपासून म्हणजे २६ फेब्रुवारीपासून आपल्या चार बछड्यांसह ही वाघिण शेताच्या जवळच असलेल्या खोलगट भागात होती. शनिवारी सकाळपर्यंत या परिसरात ती वावरत होती. परंतु आता ती या भागातून इतरत्र गेली असावी, अशी माहिती प्रविण बोळकुंटवार यांनी दिली. चार दिवसांपासून ही वाघिण याच भागात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यामुळे ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.

टॅग्स :forestजंगल