शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सुन्ना-ढोकी परिसरातील शेतीकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.

ठळक मुद्देउभ्या पिकांची सुरक्षा धोक्यात : वाघाची दहशत अद्यापही कायमच

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील सुन्ना या गावातील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतातील बांधावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला करून त्याला ठार कले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. घटना होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतात जायला कुणीही धजावत नसून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुंगरी, दर्यापूर आदी गावांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे.दरवर्षी शेतातील पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे नुकसान होते. वन्यप्राणी शेतात केव्हा शिरेल व केव्हा हल्ला करेल, याचा नेमच राहिला नाही. आता तर चक्क पट्टेदार वाघ जंगलाच्या बाहेर निघून शेतात शिरत आहे. गुरूवारी सुन्ना येथील प्रविण बोळकुंटवार यांच्या शेतात धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर वाघिणीने हल्ला केला, हे दृष्य पाहून शेतात असलेले मजूर घाबरून गेले. हा थरार काहीजणांनी आपल्या मोबाईल कॅमेºयातही कैद केला.पांढरकवडापासून ११ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सुन्ना या गावात या अभयारण्यामध्ये एक मुख्य प्रवेशद्वार आहे. याच परिसरातून अभयारण्यालगत प्रविण बोळकुंटवार यांचे शेत आहे. बुधवारी महिला मजूर त्यांच्या शेतात काम करीत असतानाच वाघाने हल्ला केल्यानंतर या महिला अतिशय भयभीत झाल्या आहेत. अद्यापही स्वत:च्या डोळ्याने पाहिलेला थरार त्या विसरल्या नाही.तेव्हापासून त्या शेतातही गेल्या नसल्याची माहिती सुन्ना येथील ग्रामस्थांनी दिली. सुन्ना व परिसरातील शेतकरी अद्यापही वाघाच्या दहशतीतच असून शेतीची संपूर्ण कामे ठप्प पडली आहेत. काही शेतकऱ्यांचे तुरीचे पीक अद्यापही काढायचे असून वाघाच्या दहशतीमुळे कोणीही शेतात जायला तयार नाही. गहू-हरभरा या पिकाची रखवाली करणे, तर सोडाच परंतु शेताकडेच फिरकायला कोणी तयार नाही.२६ फेब्रुवारीपासून तळ ठोकून होती वाघिण४गेल्या बुधवारपासून म्हणजे २६ फेब्रुवारीपासून आपल्या चार बछड्यांसह ही वाघिण शेताच्या जवळच असलेल्या खोलगट भागात होती. शनिवारी सकाळपर्यंत या परिसरात ती वावरत होती. परंतु आता ती या भागातून इतरत्र गेली असावी, अशी माहिती प्रविण बोळकुंटवार यांनी दिली. चार दिवसांपासून ही वाघिण याच भागात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यामुळे ग्रामस्थ अधिकच भयभीत झाले आहेत.

टॅग्स :forestजंगल