शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एका तपानंतरही महाप्रलयाच्या जखमा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:29 IST

९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.

ठळक मुद्देधावंडाचा महापूर : आज १४ वर्षे लोटली, पूरग्रस्त अद्यापही घरकुलाच्या प्रतीक्षेत

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : ९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.१४ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महारपुरात अनेकांचे ससार उघड्यावर आले. घरेदारे, सर्वसाहित्य वाहून गेले. नंतर महापूर ओसरला. मात्र पूरग्रस्तांवर दु:खाचे डोंगर आजही कायम आहे. पुनर्वसनाचा प्रतीक्षेत नदी काठावरील वस्तिीतील नागरिक गेल्या १४ वर्षांपासून जीव मुठीत घेऊन राहत आहे.दिग्रसला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाचा सांडवा फुटल्याने धरणातील पाणी सुसाट वेगाने वाहणारे धावंडा नदीत शिरले. तेच पाणी नदी काठावरील वस्त्यांमध्ये वाट मिळेल तसे शिरले. शहराच्या मध्यवस्तिीतील शनी मंदिर, होल्टेकपुरा, देवनगर, पोळा मैदान, पालेश्वर मंदिर, गणपती मंदिर, प्रेमनगर, संभाजीनगर, गवळीपुरा, वाल्मिकनगर, विठ्ठलनगर, गंगानगर, वैभवनगर आदी परिसराला अक्षरश: पाण्याने वेढा घातला होता. वरून पावसाची सतत धार आणि विजांचा कडकडाट सुरुच होता.मध्यरात्री बेसाधव क्षणी शेकडो घरे पाण्याखाली आली होती. प्रत्येक जण कुटुंबियांना व चिल्यापाल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापिटा करीत होता.पूरस्थिती इतकी बिकट होती की स्वत:ला वाचवायचे की कुटुंबियांना असा प्रश्न होता. त्यावेळी दुसºयाचा मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ होते. यात पूरस्थिती ओसरेपर्यंत तब्बल १६ जणांना प्राण गमवावे लागले होते. कुणाचा बाप, कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचे अख्खे कुटुंबच महापुरात वाहून गेले होते. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांनी नवीन संसार मांडण्यासाठी धावपळ सुरू झाली. या महापुरात ९७३ कुटुंबे पूर्णत: बाधित झाली. त्यांचे संसार अद्याप उघड्यावरच आहे.नगरसेवकांच्या वादामुळे रखडले घरकूलशासनाने सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली एक कोटी रुपयांचे वाटप केले. पुनर्वसनासाठी २५ कोटी मंजूर केले. मात्र हा निधी तब्बल ७ वर्षांनंतर आला. तोही खर्च झाला नाही. नगरसेवकांच्या आपसी राजकरणामुळे तो पडून राहिला. पालिकेच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकल्पाची ऐसीतैसी झाली. आजही घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. पूरग्रस्त झोपड्यांमध्ये वास्तव्य करीत आहे. नांदगव्हाण धरणही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. महापूरच्या एक तपानंतरही पूरग्रस्तांची ससेहोलपट सुरू आहे. परिणामी त्या महापुराच्या जखमा आजही कायम आहे. या जखमा कधी भरणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना सतावत आहे.