शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एका तपानंतरही महाप्रलयाच्या जखमा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:29 IST

९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.

ठळक मुद्देधावंडाचा महापूर : आज १४ वर्षे लोटली, पूरग्रस्त अद्यापही घरकुलाच्या प्रतीक्षेत

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : ९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध्वस्त झाले. या घटनेला मंगळवारी १४ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पूरग्रस्त घरकुलाच्या प्रतीक्षेतच आहे.१४ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महारपुरात अनेकांचे ससार उघड्यावर आले. घरेदारे, सर्वसाहित्य वाहून गेले. नंतर महापूर ओसरला. मात्र पूरग्रस्तांवर दु:खाचे डोंगर आजही कायम आहे. पुनर्वसनाचा प्रतीक्षेत नदी काठावरील वस्तिीतील नागरिक गेल्या १४ वर्षांपासून जीव मुठीत घेऊन राहत आहे.दिग्रसला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाचा सांडवा फुटल्याने धरणातील पाणी सुसाट वेगाने वाहणारे धावंडा नदीत शिरले. तेच पाणी नदी काठावरील वस्त्यांमध्ये वाट मिळेल तसे शिरले. शहराच्या मध्यवस्तिीतील शनी मंदिर, होल्टेकपुरा, देवनगर, पोळा मैदान, पालेश्वर मंदिर, गणपती मंदिर, प्रेमनगर, संभाजीनगर, गवळीपुरा, वाल्मिकनगर, विठ्ठलनगर, गंगानगर, वैभवनगर आदी परिसराला अक्षरश: पाण्याने वेढा घातला होता. वरून पावसाची सतत धार आणि विजांचा कडकडाट सुरुच होता.मध्यरात्री बेसाधव क्षणी शेकडो घरे पाण्याखाली आली होती. प्रत्येक जण कुटुंबियांना व चिल्यापाल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापिटा करीत होता.पूरस्थिती इतकी बिकट होती की स्वत:ला वाचवायचे की कुटुंबियांना असा प्रश्न होता. त्यावेळी दुसºयाचा मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ होते. यात पूरस्थिती ओसरेपर्यंत तब्बल १६ जणांना प्राण गमवावे लागले होते. कुणाचा बाप, कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचे अख्खे कुटुंबच महापुरात वाहून गेले होते. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांनी नवीन संसार मांडण्यासाठी धावपळ सुरू झाली. या महापुरात ९७३ कुटुंबे पूर्णत: बाधित झाली. त्यांचे संसार अद्याप उघड्यावरच आहे.नगरसेवकांच्या वादामुळे रखडले घरकूलशासनाने सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली एक कोटी रुपयांचे वाटप केले. पुनर्वसनासाठी २५ कोटी मंजूर केले. मात्र हा निधी तब्बल ७ वर्षांनंतर आला. तोही खर्च झाला नाही. नगरसेवकांच्या आपसी राजकरणामुळे तो पडून राहिला. पालिकेच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकल्पाची ऐसीतैसी झाली. आजही घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. पूरग्रस्त झोपड्यांमध्ये वास्तव्य करीत आहे. नांदगव्हाण धरणही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. महापूरच्या एक तपानंतरही पूरग्रस्तांची ससेहोलपट सुरू आहे. परिणामी त्या महापुराच्या जखमा आजही कायम आहे. या जखमा कधी भरणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना सतावत आहे.