शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा १०० दिवसांचा ॲक्शन प्लॅन; कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:29 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक विभागाने कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. विविध विभागांचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. जिल्हा मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, कृषी, नगरपालिका, वन विभाग आदी सर्वच विभागांची यंत्रणा कामाला लागली आहे. 

सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी प्रचिती नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये येते. १०० दिवसांच्या या कृती कार्यक्रमामुळे प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील कोणते विभाग हा उपक्रम यशस्वीपणे राबवितात हे १०० दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करा

  • अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी फिल्ड व्हिजीट ठेऊ नये. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे. 
  • तसेच, नगरपालिका क्षेत्रात उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांना सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना दिल्या आहे. 
  • जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडूनही ग्रामीण भागातील समस्यांवर फोकस करण्यात आला आहे. तेथे मुलभूत सोईसुविधेच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरविला जात आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व विभागांची बैठक घेण्यात आली. १०० दिवसांच्या कार्यक्रमात सात मुद्द्यांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे." - डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ