शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अतिरिक्त शिक्षक पुन्हा रुजू होणार! समायोजन होणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 03:48 IST

२०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रात विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

यवतमाळ : सहा वर्षापूर्वी विद्यार्थी संख्या घटल्याने नोकरी गमावलेल्या अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना परत नोकरीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ताज्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्या वाढलेली असल्यास संबंधित शिक्षकांना पुन्हा शाळेत पूर्ववत रुजू करून घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.

आरटीई कायदा अंमलात आल्यानंतर शाळेतील शिक्षकांची संख्या विद्यार्थी संख्येशी जोडण्यात आली. मात्र विद्यार्थी संख्या घटल्यास त्या शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना इतर शाळांमध्ये समायोजित करण्याची तरतूद आहे. परंतु ही समायोजनाची तरतूद विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना लागू नाही. त्यामुळे २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रात विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

यासंदर्भात अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी २५ जून रोजी आदेश निर्गमित केले. या निर्णयामुळे २०१४ ते २०१७ या काळात अतिरिक्त ठरुन नोकरी गमावलेल्या अंशत: अनुदानित शाळेतील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. मात्र सर्व समावेशक सेवा संरक्षणाचा विषय अद्याप संपलेला नाही. - मंगेश तिडके, अध्यक्ष, अंशत: अनुदानित सेवा संरक्षण कृती समिती.

टॅग्स :Teacherशिक्षक