शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक शाखेच्या कारवाईची गरज, मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील रस्त्यांवर व ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. या वाहनचालकांत अप्रशिक्षीत अल्पवयीन मुले, मद्यपी आणी ंविनापरवानाधारक यांचा सहभाग मोठा आहे. मद्यपान करून वेगात वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे, अशा वाहनचालकांवर आवश्यक त्या प्रमाणात कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रमाण वाढले आहे.शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे. वणी उपविभागात मारेगाव तालुक्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. बºयाच अपघातात मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणे, ही कारणे सातत्याने समोर येत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर दिवसभर शहरात पदोपदी वाहतूक नियम तोडले जात आहेत. अपघात घडून मृत्यू झाल्यावर यंत्रणेपासून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. परंतु अपघाताची जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. वाहनधारकांना आणि नागरिकांना यंत्रणेला दोष देऊन प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकत असल्याचे चित्र मारेगावात पहायला मिळते.कारवाईत सातत्य नाहीवाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरूद्ध सातत्याने कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाहीचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस एखादेवेळी कार्यवाही करताना दिसतात. त्यावेळी रोडच्या दोनही बाजुला कार्यवाहीच्या भितीने वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांनाही जबाबदारीची जाणिव नाही. वाहने वाहतुकीचे नियम सांभाळून चालविल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु नागरिक मात्र एवढी तसदी घेण्यासही तयार नसल्याचे दिसून येते. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.पोलिसांचे आवाहनआपल्या वाहनामुळे अपघात घडेल, असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन व परवाना नसलेल्या मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात अपघात घडल्यास कारणीभूत ठरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात