शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक शाखेच्या कारवाईची गरज, मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील रस्त्यांवर व ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. या वाहनचालकांत अप्रशिक्षीत अल्पवयीन मुले, मद्यपी आणी ंविनापरवानाधारक यांचा सहभाग मोठा आहे. मद्यपान करून वेगात वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे, अशा वाहनचालकांवर आवश्यक त्या प्रमाणात कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रमाण वाढले आहे.शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे. वणी उपविभागात मारेगाव तालुक्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. बºयाच अपघातात मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणे, ही कारणे सातत्याने समोर येत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर दिवसभर शहरात पदोपदी वाहतूक नियम तोडले जात आहेत. अपघात घडून मृत्यू झाल्यावर यंत्रणेपासून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. परंतु अपघाताची जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. वाहनधारकांना आणि नागरिकांना यंत्रणेला दोष देऊन प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकत असल्याचे चित्र मारेगावात पहायला मिळते.कारवाईत सातत्य नाहीवाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरूद्ध सातत्याने कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाहीचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस एखादेवेळी कार्यवाही करताना दिसतात. त्यावेळी रोडच्या दोनही बाजुला कार्यवाहीच्या भितीने वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांनाही जबाबदारीची जाणिव नाही. वाहने वाहतुकीचे नियम सांभाळून चालविल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु नागरिक मात्र एवढी तसदी घेण्यासही तयार नसल्याचे दिसून येते. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.पोलिसांचे आवाहनआपल्या वाहनामुळे अपघात घडेल, असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन व परवाना नसलेल्या मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात अपघात घडल्यास कारणीभूत ठरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात