शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आणेवारी 54 टक्क्यांपेक्षा जास्त दाखवली, ‘शेतकऱ्यांचं आक्रोश’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 17:55 IST

पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

ठळक मुद्देसंकटाची ही मालिका सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. याउलट आणेवारी ५४ टक्केच्यावर दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले

नेर (यवतमाळ) : चालू हंगामात दुबार पेरणी, परतीचा अती पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाेंडअळी, बनावट बियाणे यासोबतच अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आहे. पण सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे शुक्रवारी युवा शेतकरी संघर्ष वाहिनीच्यावतीने येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. आधीच दुबार पेरणीचे संकट. त्यात जास्त पावसाने मूग, उडीद, कापूस, साेयाबीनचे आणि परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले. बोंडअळीचे संकट मोठ्या प्रमाणात आहे.

संकटाची ही मालिका सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. याउलट आणेवारी ५४ टक्केच्यावर दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले. या सर्व बाबींचा निषेध म्हणून तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आक्रोश करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. 

पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष अरसोड, सुनील खाडे, गोपाल चव्हाण, गाैरव नाईकर, मिलन राठोड, सतीश चवाक, पंकज खानझोडे, कपिल देशमुख, सचिन भाकरे, मिथून मोंढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी