शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी 54 टक्क्यांपेक्षा जास्त दाखवली, ‘शेतकऱ्यांचं आक्रोश’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 17:55 IST

पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

ठळक मुद्देसंकटाची ही मालिका सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. याउलट आणेवारी ५४ टक्केच्यावर दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले

नेर (यवतमाळ) : चालू हंगामात दुबार पेरणी, परतीचा अती पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाेंडअळी, बनावट बियाणे यासोबतच अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आहे. पण सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे शुक्रवारी युवा शेतकरी संघर्ष वाहिनीच्यावतीने येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. आधीच दुबार पेरणीचे संकट. त्यात जास्त पावसाने मूग, उडीद, कापूस, साेयाबीनचे आणि परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले. बोंडअळीचे संकट मोठ्या प्रमाणात आहे.

संकटाची ही मालिका सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. याउलट आणेवारी ५४ टक्केच्यावर दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले. या सर्व बाबींचा निषेध म्हणून तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आक्रोश करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. 

पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष अरसोड, सुनील खाडे, गोपाल चव्हाण, गाैरव नाईकर, मिलन राठोड, सतीश चवाक, पंकज खानझोडे, कपिल देशमुख, सचिन भाकरे, मिथून मोंढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी