शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

By रूपेश उत्तरवार | Updated: August 16, 2022 17:41 IST

या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यवतमाळ : घरकुलासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतापलेल्या महिलेने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यवतमाळ तालुक्यातील वाई येथील सुमित्राबाई शंकर बनसोड यांनी घरकूल योजनेची चौकशी करून न्याय देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. सन २०१२ पासून माझ्यासह चार लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. दहा वर्ष उलटली तरी ही प्रतीक्षा यादी जैसे थे आहे. दुसरीकडे घराअभावी आमची राहण्याची आबाळ होत असून घराची मातीची भिंतही पडल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत. ग्रामपंचायतीला लागलेल्या यादीत बदल करून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन शेती असलेल्या अनेक श्रीमंतांना योजनेतून घरे मिळाली आहे. मग आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न सुमित्राबाई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. 

ग्रामपंचायतीच्या गलिच्छ राजकारणामुळे घरापासून वंचित ठेवल्याचे सांगत मागील चार वर्षांपासून बीपीएलमध्ये असतानाही रेशन मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या काहींना एकाच घरात तिघांना लाभ मिळतो, आम्ही खरे लाभार्थी असतानाही २०१२ पासून योजनेची प्रतीक्षा करावी लागते. अनेक वेळा पाठपुरावा करूनही घरकूल दिले जात नसल्याने नाईलाजाने आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे बनसोड यांनी या पत्रात म्हटले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच सुमित्राबाई बनसोड यांनी हातात पेट्रोलचा कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना ताब्यात घेऊन सुमित्राबाई यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या संपूर्ण प्रकरणात शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यापूर्वी या महिलेचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानंतर काही फेरबदल झाले. यानंतर त्यांचे नाव कुठल्या क्रमांकावर गेले हे समजले नाही. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर घरकुलाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळPoliceपोलिसIndependence Dayस्वातंत्र्य दिन