शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 12:03 IST

यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजागतिक पुस्तक दिनवाचक संख्या घटली : सोशल मीडिचाही प्रभाव

यवतमाळ : ‘वाचाल तर वाचाल’ हा शब्दप्रयाेग तंतोतंत खरा ठरविण्याचे काम विद्यादानातून प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मात्र, अलीकडे सोशल मीडियाने वाचन संस्कृतीच अडचणीत आणली आहे. यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालयात सव्वालाख पुस्तकांचा खजिना आहे. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र असे पुस्तकांचे विविध प्रकार या ठिकाणी आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. वाचन संस्कृती रुजावी आणि विपुल ज्ञान प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावे म्हणून ग्रंथालयाची संकल्पना पुढे आली. पूर्वीच्या काळी वाचक वर्ग मोठा होता. आता पुस्तक वाचणारे वाचक फारच कमी झाले आहे. केवळ ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारी मंडळी पाहायला मिळत आहे. दोन्ही घटक महत्त्वाचे असले तरी केवळ स्पर्धा परीक्षेचा वर्ग वाढत चालला आहे. वैयक्तिक वाचन करणारा वर्ग कमी होत चालला आहे.

यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालयात एक लाख २९ हजार पुस्तके आहेत. या ठिकाणी १३८१ वैयक्तिक सभासद आहेत, तर ११० संस्था सभासद आहेत. दोनशे विद्यार्थी ग्रंथालयामध्येच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. अद्ययावत अशी एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका विदर्भातील सर्वांत सुसज्ज अभ्यासिका म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्वाधिक पुस्तके आहेत. याशिवाय संपूर्ण व्यवस्था वातानुकूलित आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. याशिवाय दगडी चाळीतील जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक युवक दररोज ये-जा करतात.

सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही अभ्यासिका खुली असते. यामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा, सरळसेवा, सीईटी, अभियांत्रिकी, पोलीस भरती या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुबलक पुस्तके ग्रंथालयात आहेत. या पुस्तकांच्या अभ्यासातूनच अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. अनेकांना नोकरीही लागली आहे. आता ही संख्या वाढल्याने स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यास ग्रंथालय मोलाची भूमिका बजावणार आहे.

कादंबरी वाचक वर्ग गेला कुठे?

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी तत्काळ मिळावी असाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. रिकामा वेळ कितीही गेला तरी वाचनासाठी मात्र कुणी वेळच काढत नाही. उन्हाळ्याच्या सुटीत वाचले जाणारे कॉमिक्स आणि मनोरंजन कथांची पुस्तके याला बच्चे कंपनी हात लावत नाही. तरुण वर्ग कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, संदर्भग्रंथ याचे वाचन करीत नाही. यामुळे पूर्वी घडलेल्या घटना पुस्तकातच बंद झाल्या आहेत. त्यासाठी ग्रंथालयांना आता नवीन मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

जिल्हा ग्रंथालयाने वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय ग्रंथालयातून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. पुस्तकांमुळे अनेकांना समोरची दिशा मिळाली आहे, तर अनेकांना नोकरीचा मार्गही गवसला आहे.

- राजेंद्र कोरे, जिल्हा ग्रंथपाल, यवतमाळ

टॅग्स :Educationशिक्षणworld book dayजागतिक पुस्तक दिनlibraryवाचनालयliteratureसाहित्य