शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एकाच्या डोक्यात घातला दगड; दुसऱ्याला धरणात फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाटीपुरा येथील वैभव नाईक हत्याकांडातील आरोपी अद्यापही पसार आहेत. या घटनेची शाई वाळत नाही तोच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात युवकाचा दगड टाकून खून करण्यात आला. येळाबारा येथील वाघाडी धरणात एकाला गळा आवळून ठार केले व मृतदेह धरणात फेकला. वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास  पाेलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. येळाबारा येथील खून हा गावातीलच व्यक्तीनी केला असावा असा अंदाज आहे. या खुनात आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त आहे. त्यांनी गळा आवळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह धरणात टाकला होता. नेमका कुठल्या कारणाने हा खून झाला, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळातील पांढरकवडा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात अज्ञात युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघड झाली. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मृत हा कळंब शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अजूनही त्याची खात्री झालेली नाही. या प्रकरणात संशयित म्हणून शेख शकील शेख हकील (३५) रा. इंदिरानगर याला ताब्यात घेतले आहे. मृतक व शकील हे दोघेही गांजाचे व्यसन करीत होते. परिसरात सोबतच राहत होते. रात्री त्यांच्यात गांजा पिल्यानंतर वाद झाला या वादात शकीलने दगड मृताच्या डोक्यात घातला असे सांगितले जाते. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. शकीलच्या हातावर रक्ताचे डाग आढळून आले. यावरूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. मध्यंतरीच्या काळात खुनाच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर मधल्या चार महिन्यात हे सत्र काहिसे थांबले, असे वाटत असतानाच आठवडाभराच्या काळात पुन्हा तीन खून झाले आहेत. त्यातील दोन खून काही तासांच्या अंतराने घडले आहे.  यावरून पुन्हा खुनाचे सत्र सुरू होते काय, अशी भीती नागरिकातून  व्यक्त  केली जात आहे. 

वैभव नाईक प्रकरणातील मारेकरी मोकाटच - जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वैभव नाईकचा पाटीपुरात खून झाला. त्याच्या बरोबर चाकू हल्ल्यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. जयभीम चौकात घडलेल्या या घटनेतील आरोपी अद्यापही पसार आहेत. तेलंगणातील आदिलाबाद येथे आरोपीच्या शोधासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतल्याचे समजते. सध्या शहर पोलीस ठाण्याचे तीन पथक स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस कर्मचारीही या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र तरीही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी