शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एकाच्या डोक्यात घातला दगड; दुसऱ्याला धरणात फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाटीपुरा येथील वैभव नाईक हत्याकांडातील आरोपी अद्यापही पसार आहेत. या घटनेची शाई वाळत नाही तोच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात युवकाचा दगड टाकून खून करण्यात आला. येळाबारा येथील वाघाडी धरणात एकाला गळा आवळून ठार केले व मृतदेह धरणात फेकला. वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिल भीमराव निंबोरे मृताचा लहान भाऊ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास  पाेलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. येळाबारा येथील खून हा गावातीलच व्यक्तीनी केला असावा असा अंदाज आहे. या खुनात आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त आहे. त्यांनी गळा आवळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह धरणात टाकला होता. नेमका कुठल्या कारणाने हा खून झाला, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळातील पांढरकवडा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात अज्ञात युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघड झाली. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मृत हा कळंब शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अजूनही त्याची खात्री झालेली नाही. या प्रकरणात संशयित म्हणून शेख शकील शेख हकील (३५) रा. इंदिरानगर याला ताब्यात घेतले आहे. मृतक व शकील हे दोघेही गांजाचे व्यसन करीत होते. परिसरात सोबतच राहत होते. रात्री त्यांच्यात गांजा पिल्यानंतर वाद झाला या वादात शकीलने दगड मृताच्या डोक्यात घातला असे सांगितले जाते. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. शकीलच्या हातावर रक्ताचे डाग आढळून आले. यावरूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. मध्यंतरीच्या काळात खुनाच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर मधल्या चार महिन्यात हे सत्र काहिसे थांबले, असे वाटत असतानाच आठवडाभराच्या काळात पुन्हा तीन खून झाले आहेत. त्यातील दोन खून काही तासांच्या अंतराने घडले आहे.  यावरून पुन्हा खुनाचे सत्र सुरू होते काय, अशी भीती नागरिकातून  व्यक्त  केली जात आहे. 

वैभव नाईक प्रकरणातील मारेकरी मोकाटच - जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वैभव नाईकचा पाटीपुरात खून झाला. त्याच्या बरोबर चाकू हल्ल्यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. जयभीम चौकात घडलेल्या या घटनेतील आरोपी अद्यापही पसार आहेत. तेलंगणातील आदिलाबाद येथे आरोपीच्या शोधासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतल्याचे समजते. सध्या शहर पोलीस ठाण्याचे तीन पथक स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस कर्मचारीही या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र तरीही आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी