शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देमोफत धान्यासाठी दात्यांची प्रतीक्षा : लॉकडाऊन वाढल्याने २४ हजार कुटुंबांपुढील चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गरजवंतांना रेशन दुकानांमधून नियमित धान्यासोबत मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यानंतरही २४ हजार कुटुंबातील ९४ हजार नागरिकांना धान्य मिळालेच नाही. यामुळे वाढत्या लॉकडाऊनसोबत त्यांना दोन घासाची चिंता पडली आहे.रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे. यासोबतच २४ हजार ४२ कुटुंब रेशन कार्ड नसल्याने अपात्र ठरले आहे. या नागरिकांना धान्याची नितांत गरज आहे. मात्र अजूनही त्यांच्यासाठी उपाययोजना झाल्या नाही. यामुळे पुढील काळात घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.जिल्ह्यात एक लाख ३३ हजार १९० क्ंिवटल धान्य नियमित स्वरूपात दुकानांमधून वितरित करण्यात येते. यासोबतच दोन लाख ४५ हजार २६० क्ंिवटल धान्य अतिरिक्त स्वरुपात उचल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य जिल्ह्यात आणताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली आहे. असे असले तरी रेशन न मिळालेल्या २४ हजार कुटुंबांचा रोष पुरवठा विभागावर कायम आहे. २४ हजार कुटुंबातील ९१ हजार ८५४ नागरिकांंना धान्य हवे आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.साखर आली, पण डाळीचे काय ?स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणि गहू वितरित करण्यात येते. यासोबतच साखर आणि डाळ वितरित केली जाते. कोरोनाच्या साथरोगानंतर जिल्ह््याची डाळ आलीच नाही. साखरेसाठी अनेक पत्रव्यवहारानंतर उपलब्धतेची मान्यता मिळाली आहे. आता ही साखर पुढील महिन्यात अंत्योदय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एका कुटुंबासाठी एक किलो साखर या दराने ही साखर ग्राहकांना २० रुपये दराने मिळणार आहे. याच सुमारास डाळीचे दर गगणाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तूरडाळ मिळावी अशी अपेक्षा आहे. यापूर्वी डाळ मिळाली होती. आता अडचणीतच डाळ न मिळाल्याने नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस