शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देमोफत धान्यासाठी दात्यांची प्रतीक्षा : लॉकडाऊन वाढल्याने २४ हजार कुटुंबांपुढील चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गरजवंतांना रेशन दुकानांमधून नियमित धान्यासोबत मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यानंतरही २४ हजार कुटुंबातील ९४ हजार नागरिकांना धान्य मिळालेच नाही. यामुळे वाढत्या लॉकडाऊनसोबत त्यांना दोन घासाची चिंता पडली आहे.रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे. यासोबतच २४ हजार ४२ कुटुंब रेशन कार्ड नसल्याने अपात्र ठरले आहे. या नागरिकांना धान्याची नितांत गरज आहे. मात्र अजूनही त्यांच्यासाठी उपाययोजना झाल्या नाही. यामुळे पुढील काळात घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.जिल्ह्यात एक लाख ३३ हजार १९० क्ंिवटल धान्य नियमित स्वरूपात दुकानांमधून वितरित करण्यात येते. यासोबतच दोन लाख ४५ हजार २६० क्ंिवटल धान्य अतिरिक्त स्वरुपात उचल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य जिल्ह्यात आणताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली आहे. असे असले तरी रेशन न मिळालेल्या २४ हजार कुटुंबांचा रोष पुरवठा विभागावर कायम आहे. २४ हजार कुटुंबातील ९१ हजार ८५४ नागरिकांंना धान्य हवे आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.साखर आली, पण डाळीचे काय ?स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणि गहू वितरित करण्यात येते. यासोबतच साखर आणि डाळ वितरित केली जाते. कोरोनाच्या साथरोगानंतर जिल्ह््याची डाळ आलीच नाही. साखरेसाठी अनेक पत्रव्यवहारानंतर उपलब्धतेची मान्यता मिळाली आहे. आता ही साखर पुढील महिन्यात अंत्योदय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एका कुटुंबासाठी एक किलो साखर या दराने ही साखर ग्राहकांना २० रुपये दराने मिळणार आहे. याच सुमारास डाळीचे दर गगणाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तूरडाळ मिळावी अशी अपेक्षा आहे. यापूर्वी डाळ मिळाली होती. आता अडचणीतच डाळ न मिळाल्याने नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस