शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 10:07 IST

कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.

ठळक मुद्देयवतमाळच्या विद्यार्थिनीचा शहारे आणणारा अनुभव कोरोनाच्या संकटातून सुखरूप परतली

संतोष कुंडकर/देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आम्ही १९ दिवस अक्षरश: बंदिवासात होतो. कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र सुदैवाने आम्ही या आजारापासून वाचलो. मात्र मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून चिंचमंडळमध्ये परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ या लहानशा गावातील स्रेहल मोरेश्वर चटकी ही विद्यार्थिनी वुहानपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. स्नेहलने सांगितले की, जानेवारी महिन्यात चीनमध्ये अचानक कोरोना या जीवघेण्या आजाराचा उद्रेक झाला. शेकडो लोकांना त्याची बाधा झाली. यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खोलीच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. २४ तास तोंडाला मास्क लावून ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. भारतीय माध्यम व समाजमाध्यमावर याविषयात अतिशय चुकीची माहिती पसरविण्यात येत होती. भारतात कोरोनाबद्दल जे वातावरण तयार केले जात होते, तसे तेथे काहीही नव्हते. हा आजार पसरू नये, याची काळजी चीन सरकारकडून घेतली जात होती. नागरिकांना या आजाराची बाधा होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य खाण्या-पिण्याच्या वस्तू घरपोच दिल्या जात होत्या.कोरोनाच्या रुग्णाला ठार मारताहेत ही अफवाचवुहानमधील कोरोनाच्या संकटातून सुखरुप बाहेर पडलेली स्नेहल चटकी म्हणाली, कोरोनाच्या रूग्णाला गोळ्या घालून ठार मारण्यात येत आहे, अशा बातम्या भारतीय समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात त्या अफवा ठरल्या. कारण तेथील सरकारने असे काहीही केले नाही. उलट सर्वांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. चीनवरून निघाले तेव्हा माझ्यासोबत महाराष्ट्रातील ३४ विद्यार्थी होते. आम्ही सर्व मिळून ५०० जण होतो. त्यात काही कुटुंबांचाही समावेश होता. यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्नेहलने सांगितले.विद्यापीठात आम्हाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथे देखील अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. या काळात मी आईवडिलांच्या संपर्कात होतेच. मला आईवडिलांकडून लवकर परत येण्याचा आग्रह सुरू होता. परंतु खबरदारी म्हणून आम्हाला सोडण्यात येत नव्हते.अखेर आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क केला. त्यानंतर काळजीपूर्वक आम्हाला २ फेब्रुवारीला चीनमधून विमानाने दिल्लीत आणण्यात आले. याठिकाणी तब्बल १६ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आम्ही राहिलो. दिवसभरात अनेकदा आमच्या तपासण्या करण्यात येत होत्या. अखेर १९ फेब्रुवारीला सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आमची दिल्लीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर मी सुखरुप घरी पोहचले. मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते, याची खात्री पटल्यानंतर चीनमध्ये मांसाहार करणे बंद झाले. अंडेही कमी प्रमाणात खायला देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. वरोरा येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१८ मध्ये स्रेहलने चीनमधील हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला होता. तिचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचा व्यवसाय सांभाळतात. आई शालिनी गृहिणी आहे, तर भाऊ नीरज नागपूर येथे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना