शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 10:07 IST

कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.

ठळक मुद्देयवतमाळच्या विद्यार्थिनीचा शहारे आणणारा अनुभव कोरोनाच्या संकटातून सुखरूप परतली

संतोष कुंडकर/देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आम्ही १९ दिवस अक्षरश: बंदिवासात होतो. कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र सुदैवाने आम्ही या आजारापासून वाचलो. मात्र मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून चिंचमंडळमध्ये परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ या लहानशा गावातील स्रेहल मोरेश्वर चटकी ही विद्यार्थिनी वुहानपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. स्नेहलने सांगितले की, जानेवारी महिन्यात चीनमध्ये अचानक कोरोना या जीवघेण्या आजाराचा उद्रेक झाला. शेकडो लोकांना त्याची बाधा झाली. यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खोलीच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. २४ तास तोंडाला मास्क लावून ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. भारतीय माध्यम व समाजमाध्यमावर याविषयात अतिशय चुकीची माहिती पसरविण्यात येत होती. भारतात कोरोनाबद्दल जे वातावरण तयार केले जात होते, तसे तेथे काहीही नव्हते. हा आजार पसरू नये, याची काळजी चीन सरकारकडून घेतली जात होती. नागरिकांना या आजाराची बाधा होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य खाण्या-पिण्याच्या वस्तू घरपोच दिल्या जात होत्या.कोरोनाच्या रुग्णाला ठार मारताहेत ही अफवाचवुहानमधील कोरोनाच्या संकटातून सुखरुप बाहेर पडलेली स्नेहल चटकी म्हणाली, कोरोनाच्या रूग्णाला गोळ्या घालून ठार मारण्यात येत आहे, अशा बातम्या भारतीय समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात त्या अफवा ठरल्या. कारण तेथील सरकारने असे काहीही केले नाही. उलट सर्वांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. चीनवरून निघाले तेव्हा माझ्यासोबत महाराष्ट्रातील ३४ विद्यार्थी होते. आम्ही सर्व मिळून ५०० जण होतो. त्यात काही कुटुंबांचाही समावेश होता. यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्नेहलने सांगितले.विद्यापीठात आम्हाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथे देखील अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. या काळात मी आईवडिलांच्या संपर्कात होतेच. मला आईवडिलांकडून लवकर परत येण्याचा आग्रह सुरू होता. परंतु खबरदारी म्हणून आम्हाला सोडण्यात येत नव्हते.अखेर आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क केला. त्यानंतर काळजीपूर्वक आम्हाला २ फेब्रुवारीला चीनमधून विमानाने दिल्लीत आणण्यात आले. याठिकाणी तब्बल १६ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आम्ही राहिलो. दिवसभरात अनेकदा आमच्या तपासण्या करण्यात येत होत्या. अखेर १९ फेब्रुवारीला सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आमची दिल्लीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर मी सुखरुप घरी पोहचले. मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते, याची खात्री पटल्यानंतर चीनमध्ये मांसाहार करणे बंद झाले. अंडेही कमी प्रमाणात खायला देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. वरोरा येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१८ मध्ये स्रेहलने चीनमधील हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला होता. तिचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचा व्यवसाय सांभाळतात. आई शालिनी गृहिणी आहे, तर भाऊ नीरज नागपूर येथे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना