शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

यवतमाळ जिल्ह्यात ८३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 10:44 IST

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९२५ ग्रामपंचायतींच्या ८ हजार १०१ जगांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल ८३.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्दे१७ हजार उमेदवारांचे राजकीय भाग्य मशीनबंद

लोकमत न्यूज नेटवर्क  

यवतमाळ : जिल्ह्यातील ९२५ ग्रामपंचायतींच्या ८ हजार १०१ जगांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल ८३.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदानासाठी अनेक केंद्रांवर रांग लागली होती. अपवाद वगळता सर्वत्र मतदान पार पडले.

शुक्रवारी सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. दुपारी ३:३० पर्यंत ६२ टक्के मतदान पार पडले.

जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार होती. यातील ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामुळे ९२५ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानवेरीला पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद पणाला लावली होती. एक मत खेचून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळे सायंकाळपर्यंत ८३.१५ टक्के मतदान झाले.

३ हजार ७१ प्रभांगामध्ये ८ हजार ८०१ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी १० हजार ५०० कर्मचारी तैनात होते. निवडणुकीमध्ये कोरोनाग्रस्त मतदारांसाठी अर्धा तासांचा अवधी आरक्षित ठेवण्यात आला होता. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर हँड सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स बंधनकारक करण्यात आले होते. या नियमाचे काही ठिकाणी पालन झाले, तर काही ठिकाणी उल्लंघन झाले.

काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावे चुकल्याच्या तक्रारी यावेळी पुढे आल्या . संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष होते. या ठिकाणाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आर्णी ६६, बाभूळगाव ५०, दारव्हा ७३, दिग्रस ४६, घाटंजी ४९, कळंब ५६, केळापूर ४०, महागाव ७१, मारेगाव ३०, नेर ४९, पुसद ९८, राळेगाव ४६, उमरखेड ७५, वणी ७४, यवतमाळ ६६, तर झरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये महिलांची संख्या अधिक होती. काेरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. विकासाच्या मुद्यावर मतदान पार पडले.

निवडणूक प्रक्रियेत आपल्या पक्षाची बाजू मजबूत व्हावी म्हणून प्रत्येक पक्षाने आपली शक्ती पणाला लावली होती. प्रत्येक गावामध्ये नवख्या उमेदवारांचे पॅनल भाव खाऊन गेले. याशिवाय सरपंचपदाची थेट निवडणूक नसल्याने गावपातळीवर मोठी चुरस पाहायला मिळाली. आपणच सरपंच होऊ, या आशेने प्रत्येक उमेदवार वावरताना पाहायला मिळाला. मतमोजणी सोमवारी होणार आहे. तालुकास्तरावर यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ८:३० पासून मतमोजणीला प्रारंभ होईल. गावात सत्ता कुणाची, यासाठी सोमवारपर्यंत मतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक