शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जिल्ह्यात कॉलराचे ८३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:33 IST

जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सुस्त : २० वर्षानंतर जीवघेणा कॉलरा परतला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १२६ उपकेंद्र आहेत. शिवाय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतरही जीवघेणा कॉलराची साथ झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुस्त असून याची खबरताबही त्यांना नाही. इतकेच नव्हेतर जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधीसुध्दा याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालया एप्रिल महिन्यापासून ५ जूनपर्यंत ४०१ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील ८३ रुग्णांना कॉलरा असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. कॉलरा हा जलजन्य आजार असून त्याचा झपाट्याने फैलाव होते. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही तर परिस्थीती हाताबाहेर जाऊ शकते. ग्रामीण व शहरी भागात डायरीचेही अनेक रुग्ण आहेत. गुरूवारी वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंध वॉर्डात २२ रूग्ण उपचार घेत आहे. या सर्वांना डायरीयाची लागण झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दर दिवशी या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपया योजना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील परसोडी, देऊरवाडी, म्हसोला (आर्णी), आसेगावदेवी (बाभुळगाव), भुलाई (दारव्हा), मांगलादेवी (नेर), नागीपोड (राळेगाव), वाटखेड, जामडोह, तिवसा, किन्ही (यवतमाळ), दोनोडा (कळंब) या गावांमधून रूग्ण दाखल झाले आहेत. या शिवाय शहरातील पाटीपुरा, नेताजीनगर, माळीपुरा, वडगाव, सुभाषनगर, वंजारीफैल, पिंपळगाव, सिंघानीयानगर, उमरसरा येथील रुग्ण दाखल झाले आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून येथील स्वच्छता व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच उपाय योजना केली जात नाही. इतकेच नव्हे तर नगरपरिषद आरोग्य विभाग डुकरांचे नियंत्रण करण्यात अपयशी ठराला आहे.नगरपरिषदेचा प्रतिसाद नाहीपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित डॉक्टर ठेवण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. येथे सर्वच विभागातील डॉक्टर सेवा देतील असे प्रस्तावित केले होते. मात्र नगरपरिषदेने याला मान्यता दिली नाही. येथे मोठी जागा असूनही स्थानिक रुग्णासाठी पालिकेतूनच आडकाठी निर्माण केली जात आहे. नागरी आरोग्य केंद्रात रुग्णांचा प्रतिसाद नसल्याने आयुर्वेदिक रुग्णालयातून सेवा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद