शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यात कॉलराचे ८३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:33 IST

जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सुस्त : २० वर्षानंतर जीवघेणा कॉलरा परतला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १२६ उपकेंद्र आहेत. शिवाय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतरही जीवघेणा कॉलराची साथ झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुस्त असून याची खबरताबही त्यांना नाही. इतकेच नव्हेतर जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधीसुध्दा याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालया एप्रिल महिन्यापासून ५ जूनपर्यंत ४०१ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील ८३ रुग्णांना कॉलरा असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. कॉलरा हा जलजन्य आजार असून त्याचा झपाट्याने फैलाव होते. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही तर परिस्थीती हाताबाहेर जाऊ शकते. ग्रामीण व शहरी भागात डायरीचेही अनेक रुग्ण आहेत. गुरूवारी वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंध वॉर्डात २२ रूग्ण उपचार घेत आहे. या सर्वांना डायरीयाची लागण झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दर दिवशी या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपया योजना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील परसोडी, देऊरवाडी, म्हसोला (आर्णी), आसेगावदेवी (बाभुळगाव), भुलाई (दारव्हा), मांगलादेवी (नेर), नागीपोड (राळेगाव), वाटखेड, जामडोह, तिवसा, किन्ही (यवतमाळ), दोनोडा (कळंब) या गावांमधून रूग्ण दाखल झाले आहेत. या शिवाय शहरातील पाटीपुरा, नेताजीनगर, माळीपुरा, वडगाव, सुभाषनगर, वंजारीफैल, पिंपळगाव, सिंघानीयानगर, उमरसरा येथील रुग्ण दाखल झाले आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून येथील स्वच्छता व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच उपाय योजना केली जात नाही. इतकेच नव्हे तर नगरपरिषद आरोग्य विभाग डुकरांचे नियंत्रण करण्यात अपयशी ठराला आहे.नगरपरिषदेचा प्रतिसाद नाहीपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित डॉक्टर ठेवण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. येथे सर्वच विभागातील डॉक्टर सेवा देतील असे प्रस्तावित केले होते. मात्र नगरपरिषदेने याला मान्यता दिली नाही. येथे मोठी जागा असूनही स्थानिक रुग्णासाठी पालिकेतूनच आडकाठी निर्माण केली जात आहे. नागरी आरोग्य केंद्रात रुग्णांचा प्रतिसाद नसल्याने आयुर्वेदिक रुग्णालयातून सेवा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद