शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यात कॉलराचे ८३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:33 IST

जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सुस्त : २० वर्षानंतर जीवघेणा कॉलरा परतला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १२६ उपकेंद्र आहेत. शिवाय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतरही जीवघेणा कॉलराची साथ झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुस्त असून याची खबरताबही त्यांना नाही. इतकेच नव्हेतर जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधीसुध्दा याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालया एप्रिल महिन्यापासून ५ जूनपर्यंत ४०१ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील ८३ रुग्णांना कॉलरा असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. कॉलरा हा जलजन्य आजार असून त्याचा झपाट्याने फैलाव होते. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही तर परिस्थीती हाताबाहेर जाऊ शकते. ग्रामीण व शहरी भागात डायरीचेही अनेक रुग्ण आहेत. गुरूवारी वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंध वॉर्डात २२ रूग्ण उपचार घेत आहे. या सर्वांना डायरीयाची लागण झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दर दिवशी या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपया योजना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील परसोडी, देऊरवाडी, म्हसोला (आर्णी), आसेगावदेवी (बाभुळगाव), भुलाई (दारव्हा), मांगलादेवी (नेर), नागीपोड (राळेगाव), वाटखेड, जामडोह, तिवसा, किन्ही (यवतमाळ), दोनोडा (कळंब) या गावांमधून रूग्ण दाखल झाले आहेत. या शिवाय शहरातील पाटीपुरा, नेताजीनगर, माळीपुरा, वडगाव, सुभाषनगर, वंजारीफैल, पिंपळगाव, सिंघानीयानगर, उमरसरा येथील रुग्ण दाखल झाले आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून येथील स्वच्छता व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच उपाय योजना केली जात नाही. इतकेच नव्हे तर नगरपरिषद आरोग्य विभाग डुकरांचे नियंत्रण करण्यात अपयशी ठराला आहे.नगरपरिषदेचा प्रतिसाद नाहीपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित डॉक्टर ठेवण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. येथे सर्वच विभागातील डॉक्टर सेवा देतील असे प्रस्तावित केले होते. मात्र नगरपरिषदेने याला मान्यता दिली नाही. येथे मोठी जागा असूनही स्थानिक रुग्णासाठी पालिकेतूनच आडकाठी निर्माण केली जात आहे. नागरी आरोग्य केंद्रात रुग्णांचा प्रतिसाद नसल्याने आयुर्वेदिक रुग्णालयातून सेवा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद