शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

८२ हजार विद्यार्थी ४०० रूपयांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:16 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : बँक खातेच नसल्याने दिवाळी होऊनही गणवेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास दोन लाख ४१ हजारांच्यावर विद्यार्थी गणवेशाच्या रकमेसाठी पात्र आहेत. आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मात्र यावर्षी गणवेश न देता दोन गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांसह बँकांमध्ये खाते काढले. नंतर वडिलांऐवजी आईसह संयुक्त खाते काढण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आईच्या नावासह संयुक्त खाते काढण्यासाठी धावपळ करावी लागली.शाळा सुरू झाल्यापासून सतत धावपळ करूनही आत्तापर्यंत एक लाख ५९ हजार ५११ विद्यार्थ्यांच्याच खात्यात प्रत्येकी ४०० रूपयांची रक्कम जमा होऊ शकली नाही. उर्वरित ८२ हजार २२० विद्यार्थ्यांनी अद्यापही खातेच काढले नाही. परिणामी त्यांच्या पलकांना दिवाळी उलटूनही गणवेशाची रक्कम मिळाली नाही. बँकेत खाते काढण्यासाठी त्यांच्या सतत चकरा सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने त्यांचे खातेच निघाले नाही. शासनाच्या तुघलकी निर्णयामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेशाची रक्कम मिळू शकली नाही. बँॅकेत खाते काढण्यासाठी अजूनही त्यांची धावपळ सुरूच आहे.आधीचीच प्रक्रिया होती बरीअनेक पालकांनी यापूर्वीचीच प्रक्रिया बरोबर होती, असे मत मांडले. यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेमार्फतच प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मात्र ही पद्धत मोडीत काढून आता ४०० रूपये देण्याचा निर्णय झाला. यापूर्वी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसाठी एकदाच कापड खरेदी करीत होते. त्यामुळे कापड कमी दरात मिळत होता. आता प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळे कापड घ्यावे लागते. त्यामुळे पूर्वीचीच पद्धत योग्य होती, असे अनेक पालकांनी सांगितले.