शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
3
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
4
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
5
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
6
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
7
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
8
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
9
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
10
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
11
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
12
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
13
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
14
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
15
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
16
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
17
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
18
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
19
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
20
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी

रेल्वेचे ८० टक्के रिझर्वेशन प्रवाशांअभावी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST

कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. यामुळे या मार्गावर असणाऱ्या प्रवासी स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. 

ठळक मुद्देकोरोनाने प्रवासी थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. यामुळे सर्वाधिक प्रवासी मिळविणाऱ्या रेल्वेवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होते. यासाठी नागरिक चार ते पाच महिने आधीच बाहेरगावी जाण्यासाठी बुकिंग करतात. कोरोना साथीपासून हे चित्र पार बिघडले आहे. बुकिंग झालेल्या एकूण प्रवाशांपैकी ८० टक्के प्रवासी आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. यामुळे या मार्गावर असणाऱ्या प्रवासी स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. पूर्वी दरदिवसाला तीन ते साडेतीन लाख रुपयांचे बुकिंग यवतमाळमधून होत हाेते. आता प्रवासी संख्या घटल्याने हे बुकिंग एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खाली आले आहे. यातही अनेक प्रवासी वेळेवर आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाची स्थिती सुधारेपर्यंत रेल्वेच्या प्रवासाचे चित्र असेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकप्रिय फेऱ्या प्रभावितजिल्ह्यातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे लोंढे विदर्भ एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस या रेल्वे मार्गाने जात होते. पुण्यात आणि मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातून याठिकाणाकडे जाणारे प्रवासी थांबले आहेत. परिणामी रेल्वेच्या फेऱ्यांना मिळणारी प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे ॲडव्हान्स बुकिंग ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूण बुकिंग झाल्यानंतर वेळेपर्यंत ८० टक्के बुकिंग रद्द होत आहे. २० टक्केच प्रवासी रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळत आहे.

परीक्षेनंतर अवकळा

नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये गेले होते. रेल्वेचे तिकीट कमी असल्याने परीक्षेच्या काळात रेल्वे सर्वाधिक हाऊसफुल्ल होती. परीक्षा झाल्यानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. नियमित प्रवास करणारे प्रवासीही थांबले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे