शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

By admin | Updated: May 31, 2016 23:59 IST

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या.

सदस्य निश्चित : यवतमाळ पालिकेत राहणार ५६ सदस्य यवतमाळ : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या. यवतमाळ नगरपरिषदेत सर्वाधिक ५६ सदस्य राहणार असून सध्याच्या नगरसेवकाच्या संख्येत १५ ने भर पडणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या निश्चितीचा अहवाल मागविण्यात आला होता. पाठविलेल्या अहवालाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामुळे कुठल्या नगरपरिषदेत किती सदस्य असतील हे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली आहे. किती लोकसंखेला एक सदस्य असावा याचा अहवाल नगरपरिषदेच्या निवडणूक विभागाने पाठविला आहे. या अहवालास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य यवतमाळ नगरपरिषदेचे आहेत. पूर्वी यवतमाळ नगरपरिषदेची सदस्य संख्या ४१ होती. दोन लाख ५१ हजार १२४ लोकसंख्येला ५६ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत १५ सदस्य नगरपरिषदेत वाढणार आहेत.पुसद नगरपरिषदेच्या ७३ हजार ४८ लोकसंख्येला २९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. वणीमध्ये ५८ हजार ८४० लोकसंख्येला २६ सदस्य असणार आहेत. उमरखेडमध्ये ४७ हजार ४५८ लोकसंख्येला २४ सदस्य निश्चित करण्यात आले आहे. दिग्रस नगरपरिषदेमध्ये ४४ हजार ७६७ लोकसंख्येमागे २३ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. दारव्हा नगरपरिषदेत ३४ हजार ९४ लोकसंख्येमागे २० सदस्य निश्चित झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेत ३१ हजार ५९७ लोकसंख्येला १९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. घाटंजी नगरपरिषदेत २१ हजार ३९३ लोकसंख्येला २० सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर सात ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. लोहारा, वडगाव, उमरसरा, वाघापूर, भोसा, मोहा, पिंपळगाव यांचा समावेश आहे. त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती राहणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून होते. आता सदस्य संख्या निश्चित झाल्यानंतर प्रभाग रचनेची उत्सुकता आहे. यावर्षी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. हद्दवाढीने शहराचे राजकीय समीकरण बदलले असून अनेक इच्छुक आपली ताकद आजमाविण्यासाठी तयारी करीत आहे. (शहर वार्ताहर)जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचनानगरपरिषदांतील सदस्य संख्या २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. आता प्रभाग रचनेसाठीसुद्धा जनगणनेतील प्रगणकाचा आधार घेऊनच केली जाणार आहे. त्यानुसार चक्राकार पद्धतीने त्या-त्या प्रभागातील जागेचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत यावरच विजयाचे गणित अवलंबून असते. या दोनही प्रक्रियेवर इच्छुकांचे बारिक लक्ष आहे. अद्याप तरी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी येत्या काही दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ केली जाणार आहे. त्या दृष्टीकोणातून प्रशासनाची तयारी सुरू आहे.