शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आठ नगरपरिषदांत २१४ नगरसेवक

By admin | Updated: May 31, 2016 23:59 IST

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या.

सदस्य निश्चित : यवतमाळ पालिकेत राहणार ५६ सदस्य यवतमाळ : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सदस्य संख्या निश्चित केली असून जिल्ह्यातील आठ नगरपरिषदात २१४ जागा निश्चित करण्यात आल्या. यवतमाळ नगरपरिषदेत सर्वाधिक ५६ सदस्य राहणार असून सध्याच्या नगरसेवकाच्या संख्येत १५ ने भर पडणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या निश्चितीचा अहवाल मागविण्यात आला होता. पाठविलेल्या अहवालाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामुळे कुठल्या नगरपरिषदेत किती सदस्य असतील हे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली आहे. किती लोकसंखेला एक सदस्य असावा याचा अहवाल नगरपरिषदेच्या निवडणूक विभागाने पाठविला आहे. या अहवालास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य यवतमाळ नगरपरिषदेचे आहेत. पूर्वी यवतमाळ नगरपरिषदेची सदस्य संख्या ४१ होती. दोन लाख ५१ हजार १२४ लोकसंख्येला ५६ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत १५ सदस्य नगरपरिषदेत वाढणार आहेत.पुसद नगरपरिषदेच्या ७३ हजार ४८ लोकसंख्येला २९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. वणीमध्ये ५८ हजार ८४० लोकसंख्येला २६ सदस्य असणार आहेत. उमरखेडमध्ये ४७ हजार ४५८ लोकसंख्येला २४ सदस्य निश्चित करण्यात आले आहे. दिग्रस नगरपरिषदेमध्ये ४४ हजार ७६७ लोकसंख्येमागे २३ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. दारव्हा नगरपरिषदेत ३४ हजार ९४ लोकसंख्येमागे २० सदस्य निश्चित झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेत ३१ हजार ५९७ लोकसंख्येला १९ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. घाटंजी नगरपरिषदेत २१ हजार ३९३ लोकसंख्येला २० सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर सात ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. लोहारा, वडगाव, उमरसरा, वाघापूर, भोसा, मोहा, पिंपळगाव यांचा समावेश आहे. त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेची सदस्य संख्या नेमकी किती राहणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून होते. आता सदस्य संख्या निश्चित झाल्यानंतर प्रभाग रचनेची उत्सुकता आहे. यावर्षी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. हद्दवाढीने शहराचे राजकीय समीकरण बदलले असून अनेक इच्छुक आपली ताकद आजमाविण्यासाठी तयारी करीत आहे. (शहर वार्ताहर)जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचनानगरपरिषदांतील सदस्य संख्या २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. आता प्रभाग रचनेसाठीसुद्धा जनगणनेतील प्रगणकाचा आधार घेऊनच केली जाणार आहे. त्यानुसार चक्राकार पद्धतीने त्या-त्या प्रभागातील जागेचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत यावरच विजयाचे गणित अवलंबून असते. या दोनही प्रक्रियेवर इच्छुकांचे बारिक लक्ष आहे. अद्याप तरी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी येत्या काही दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ केली जाणार आहे. त्या दृष्टीकोणातून प्रशासनाची तयारी सुरू आहे.