शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

राज्यात ७८% खेडी मूलभूत सुविधांपासून वंचित; कुठे नाहीत रस्ते तर कुठे पाेहाेचली नाही वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 08:32 IST

‘विकास’ आलाच नाही गावात, पाण्यासाठीही वणवण

-अविनाश साबापुरेयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सर्वच सरकारांकडून विकासाचे दावे केले जात आहेत. मात्र, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही महाराष्ट्रातील तब्बल ७८ टक्के खेडी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर अहवाल पुढे आला आहे. राज्यातील साडेतीनशे तालुक्यांमधील गावनिहाय परिस्थितीवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, त्यात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, सिंचन, रेशन अशा विविध पातळीवरील आबाळ पुढे आणली गेली आहे. 

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा आधार घेत बंगळुरू  येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाने हा अहवाल तयार केला आहे. यात देशातील साडेसहा लाख खेड्यांचा अभ्यास करण्यात आला. संपूर्ण देशातच खेड्यांची अवस्था वाईट असून, महाराष्ट्रातही खडतर परिस्थिती आहे. सिंचनापासून आरोग्यापर्यंत १३ निकषांवर या अहवालात खेड्यांच्या मागासलेपणाचा निर्देशांक निश्चित केला गेला. त्यात किमान पाच निकषही पूर्ण करू न शकलेल्या खेड्यांची संख्या ७८ टक्के आहे. त्यांना अतिमागास ठरविले गेले, तर सहा हजार ५०० खेड्यांत यातील ११ निकषही पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. 

    घरात आधुनिक स्वच्छतागृह नाही    ७०%    गावात ब्राॅडबँड, इंटरनेट नाही    ६६%    १० किमीत रोजगार शिक्षण केंद्र नाही    ५३%    कमी वजनाची मुले आढळतात    ४९%    गावातील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत    ४५%    गावाला जोडणारा बारमाही रस्ता नाही    ३७%    गावात एक तरी मूल शाळाबाह्य आहे     ३६%     कुपोषित स्तनदा माता आढळतात    ३५%    १० किमी अंतरात एटीएम नाही    ३१%    सांडपाणी वाहून नेण्याची सोय नाही    २८%    कुपोषित तरुण मुली आढळतात    २७%    १० किमी अंतरात एकही बँक नाही    २५%    १० किमी अंतरात बाजारपेठ नाही    २२%    गावात एसटी नाही, वाहतूक सेवा नाही    २०%    सिंचनाची सुविधा नसलेली गावे    १८%    १० किमी अंतरात रेशन दुकान नाही    १६%    गावात मोबाइल किंवा फोन नाही    १६%    १० किमी अंतरात आरोग्य केंद्र नाही    १६%    एकही अंगणवाडी केंद्र नाही    ११%    एकाही घरात नळजोडणी नाही    ६%    एकाही घरी वीज जोडणी नाही    ५%    १० किमी अंतरात प्राथमिक शाळा नाही    ३%

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र