शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लघु सिंचनचे ३६ गावांत ७५ बंधारे

By admin | Updated: February 10, 2016 03:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे.

२१ प्रगतिपथावर : ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन, पहुरचा बंधारा अजूनही तुडुंबयवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या कामांना गती देण्यात आली आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) विभागाने मागील सहा महिन्यात ३६ गावांमध्ये ७५ बंधाऱ्यांची निर्मिती केली. २१ गावातील कामे प्रगतिपथावर आहे. निर्माण झालेल्या बंधाऱ्यातील पाण्याद्वारे ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहूर इजारा (ता.कळंब) येथे बांधलेला बंधारा अजूनही तुडुंब भरून आहे. यातील पाण्याच्या आधारे रबी पिकाचे सिंचन केले जात आहे. सतत तीन पंपाद्वारे उपसा करून ५० एकरात ओलित करण्यात येत आहे. दिग्रस तालुक्याच्या विठाळा येथे चार बंधाऱ्यातून २१ एकरात संरक्षित सिंचन करण्यात येत आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीची पातळी यावर्षी आॅगस्टमध्ये २५ फुट वाढली आहे. गतवर्षी १५ फुट एवढीच वाढली होती. हा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांनी सांगितले.लघु सिंचन विभागाने ४० गावांमध्ये ९६ बंधाऱ्यांची कामे मे २०१५ अखेर हाती घेतली. यातील ७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या कामावर पाणीसाठी निर्मिती २०० सघमी असून निर्माण झालेली सिंचन क्षमता ३० हेक्टर (सिंगल फिलिंग गृहित धरून) आहे. सदर अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली होती. यातील ५७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात १७७ बांधाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातूनच ७५ कामे पूर्णत्वास गेली आहेत. सर्वाधिक ११ बंधारे कळंब आणि दारव्हा तालुक्यात पूर्ण झालेले आहे. पांढरकवडा तालुक्यात १० बंधारे बांधले आहे. प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये ही कामे घेण्यात आली. त्यामुळे पाण्याची पातळी टिकून राहण्यासोबतच सिंचनातही वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)