शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लघु सिंचनचे ३६ गावांत ७५ बंधारे

By admin | Updated: February 10, 2016 03:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे.

२१ प्रगतिपथावर : ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन, पहुरचा बंधारा अजूनही तुडुंबयवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या कामांना गती देण्यात आली आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) विभागाने मागील सहा महिन्यात ३६ गावांमध्ये ७५ बंधाऱ्यांची निर्मिती केली. २१ गावातील कामे प्रगतिपथावर आहे. निर्माण झालेल्या बंधाऱ्यातील पाण्याद्वारे ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहूर इजारा (ता.कळंब) येथे बांधलेला बंधारा अजूनही तुडुंब भरून आहे. यातील पाण्याच्या आधारे रबी पिकाचे सिंचन केले जात आहे. सतत तीन पंपाद्वारे उपसा करून ५० एकरात ओलित करण्यात येत आहे. दिग्रस तालुक्याच्या विठाळा येथे चार बंधाऱ्यातून २१ एकरात संरक्षित सिंचन करण्यात येत आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीची पातळी यावर्षी आॅगस्टमध्ये २५ फुट वाढली आहे. गतवर्षी १५ फुट एवढीच वाढली होती. हा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांनी सांगितले.लघु सिंचन विभागाने ४० गावांमध्ये ९६ बंधाऱ्यांची कामे मे २०१५ अखेर हाती घेतली. यातील ७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या कामावर पाणीसाठी निर्मिती २०० सघमी असून निर्माण झालेली सिंचन क्षमता ३० हेक्टर (सिंगल फिलिंग गृहित धरून) आहे. सदर अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली होती. यातील ५७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात १७७ बांधाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातूनच ७५ कामे पूर्णत्वास गेली आहेत. सर्वाधिक ११ बंधारे कळंब आणि दारव्हा तालुक्यात पूर्ण झालेले आहे. पांढरकवडा तालुक्यात १० बंधारे बांधले आहे. प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये ही कामे घेण्यात आली. त्यामुळे पाण्याची पातळी टिकून राहण्यासोबतच सिंचनातही वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)