शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
5
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
6
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
7
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
8
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
9
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
10
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
11
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
12
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
13
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
14
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
15
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
16
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
17
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
18
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
19
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

लघु सिंचनचे ३६ गावांत ७५ बंधारे

By admin | Updated: February 10, 2016 03:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे.

२१ प्रगतिपथावर : ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन, पहुरचा बंधारा अजूनही तुडुंबयवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे बारमाही पीक घेता यावे, जलस्रोताची पातळी वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी जिल्ह्यात सिमेंट बंधारे बांधले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या कामांना गती देण्यात आली आहे. लघु सिंचन (स्थानिक स्तर) विभागाने मागील सहा महिन्यात ३६ गावांमध्ये ७५ बंधाऱ्यांची निर्मिती केली. २१ गावातील कामे प्रगतिपथावर आहे. निर्माण झालेल्या बंधाऱ्यातील पाण्याद्वारे ३० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहूर इजारा (ता.कळंब) येथे बांधलेला बंधारा अजूनही तुडुंब भरून आहे. यातील पाण्याच्या आधारे रबी पिकाचे सिंचन केले जात आहे. सतत तीन पंपाद्वारे उपसा करून ५० एकरात ओलित करण्यात येत आहे. दिग्रस तालुक्याच्या विठाळा येथे चार बंधाऱ्यातून २१ एकरात संरक्षित सिंचन करण्यात येत आहे. या बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीची पातळी यावर्षी आॅगस्टमध्ये २५ फुट वाढली आहे. गतवर्षी १५ फुट एवढीच वाढली होती. हा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांनी सांगितले.लघु सिंचन विभागाने ४० गावांमध्ये ९६ बंधाऱ्यांची कामे मे २०१५ अखेर हाती घेतली. यातील ७५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या कामावर पाणीसाठी निर्मिती २०० सघमी असून निर्माण झालेली सिंचन क्षमता ३० हेक्टर (सिंगल फिलिंग गृहित धरून) आहे. सदर अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली होती. यातील ५७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात १७७ बांधाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातूनच ७५ कामे पूर्णत्वास गेली आहेत. सर्वाधिक ११ बंधारे कळंब आणि दारव्हा तालुक्यात पूर्ण झालेले आहे. पांढरकवडा तालुक्यात १० बंधारे बांधले आहे. प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये ही कामे घेण्यात आली. त्यामुळे पाण्याची पातळी टिकून राहण्यासोबतच सिंचनातही वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)