शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

नॅशनल हायवेसाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहण

By admin | Updated: July 29, 2016 02:16 IST

जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली ...

डिसेंबरपर्यंत प्रक्रिया : जिल्ह्यात १५३ किमींचा चौपदरी सिमेंट रस्ता सुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ७४५ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. जिल्ह्यात १५३ किलोमीटरचा चौपदरी सिमेंट रस्ता तयार केला जाणार असून जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग यामुळे खुला होणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ जिल्ह्यातील ६४ गावांमधून जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (नाही) भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही या महामार्गाच्या अनुषंगाने सातत्याने आढावा घेतला जात आहे. २२ जुलै रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे या महामार्गाचा आढावा घेतला. यावेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ सचिव उपस्थित होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा वरिष्ठ पातळीवरूनच सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी नोव्हेंबर २०१५ मध्येच अधिग्रहणासंदर्भात प्रसिद्धी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हे काम अनेक दिवस थंडबस्त्यात होते. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. आता थेट केंद्राकडूनच याचा फॉलोअप घेण्यात येत आहे. दरदिवशीची प्रगती काय याची विचारणा होत असल्याने डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याला गती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कायद्यातील १९५६ च्या तरतुदीनुसार भूसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी दोन वर्षाचा मर्यादित कालावधी आहे. भविष्यात हा मार्ग बुटीबोरी ते रत्नागिरीपर्यंत जोडण्यात येणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या देखभालीचे नो-टेंशन सिमेंट रस्ता होत असल्याने किमान ५० वर्षापर्यंत त्याच्या देखभाल दुरुस्तीची गरज भासणार नाही. या महामार्गामुळे राज्य सरकारला केवळ ग्रामीण रस्त्यांवरच लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. थेट केंद्रातून निधी मिळत असून पहिल्या टप्प्यातील दहा हजार कोटींचा निधी खर्चाचे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असून शेतकऱ्यांकडूनही सहकार्य मिळत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी सहनियंत्रक म्हणून भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे रेल्वे मार्गाच्याही भूसंपादनाची जबाबदारी आहे. - सचिंद्र प्रताप सिंह जिल्हाधिकारी, यवतमाळ भूसंपादनासाठी यवतमाळ, राळेगाव, उमरखेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकरण म्हणून अधिकार देण्यात आले आहे. आतापर्यंत ४० गावांच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये कलम ३ (अ) ची प्राथमिक अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी प्रथमच आॅनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. - विजय भाकरे सहनियंत्रक, राष्ट्रीय महामार्ग