शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

६८ गावांमधील पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:02 IST

वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्याच्या ६८ गावातील नळ योजनेची वीज तोडण्यात आली आहे. गावातील पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

ठळक मुद्देवीज तोडली : नेर तालुक्यात दीड कोटी थकीत, भटकंती सुरू

ऑनलाईन लोकमतनेर : वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्याच्या ६८ गावातील नळ योजनेची वीज तोडण्यात आली आहे. गावातील पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. लोकांकडे असलेली कराची रक्कम वसूल करण्यात ग्रामपंचायतीकडून झालेली दिरंगाई यामुळेच हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जाते.विद्युत कंपनीच्या नेर व लाडखेड विभागात ७१ गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित आहे. यातील ६८ योजनांची वीज तोडण्यात आली. गावातील हातपंप आणि विहिरींना पाणी नाही. अशातच नळयोजनेचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. वीज बिलाचा भरणा तत्काळ करण्याची सूचना ग्रामपंचायतींना वारंवार देण्यात आली. यानंतरही ग्रामपंचायतींनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही.सोनवाढोणा ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३३ हजार, मालखेड ३ लाख ५५ हजार, बाळेगाव ३ लाख ५८ हजार, लाडखेड ८ लाख १४ हजार, जांभोरा ४ लाख ७२ हजार, चिकणी ४ लाख २९ हजार, वटफळी ९ लाख २२ हजार, पिंप्रीकलगा ६ लाख २५ हजार, मांगलादेवी ७ लाख २१ हजार, ब्राम्हणवाडा ४ लाख ४८ हजार एवढी वीज बिलाची थकीत रक्कम आहे.ग्रामपंचायतीकडून पाणी कराची वसूली चांगली होत असल्याचे सांगितले जाते. मात्र ही रक्कम इतर कामांवर खर्ची घातली जाते. यावर गटविकास अधिकाºयांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पाणी कराची वसूली नियमित भरणा करणाºया नागरिकांना आता पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.महावितरण कंपनीच्या आदेशाने ६८ नळयोजनांची वीज तोडण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी रकमेचा भरणा न केल्याने ही कारवाई करावी लागली.- सतीश कानडेसहायक अभियंता, नेर(लाडखेड विभाग)

टॅग्स :Waterपाणी