शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:25 IST

जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे.

ठळक मुद्दे४५ कोटी हवे : कृषी व महसूल विभागाचा संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी ४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्टरला फटका बसला. ५०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात सहा हजार ८६० शेतकºयांचे ३२६७ हेक्टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५ हजार ८८० हेक्टरचे नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयाची मागणी संयुक्त पंचनाम्यात करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल काय?पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २४ तासात २५ टक्के रक्कम अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या बाधीत शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत नव्याने नुकसानीचा सामना करणाºया शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती