शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकले; ५९०० कोटी मिळालेच नाही

By रूपेश उत्तरवार | Updated: January 3, 2023 15:49 IST

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी रेड यादीने लटकले

यवतमाळ : भाजप-शिवसेना युती काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेत प्रारंभापासून अनेक तांत्रिक अडचणी आल्या. रेड, येलो, ग्रीन यादी आल्यानंतरच कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले. मात्र, अद्याप त्यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीची रक्कम सहा लाख शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

प्रक्रिया राबविताना विलंब झाला. नंतरच्या काळात सरकार बदलले. या गोंधळात राज्यातील सहा लाख शेतकरी अडचणीत सापडले. हे शेतकरी कर्जमाफीला पात्र असले, तरी त्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ५९०० कोटी अद्याप जमाच झाले नाही. नव्याने शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तत्कालीन युती सरकारने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. योजनेच्या अंमलबजावणीच्या काळात आचारसंहिता लागू झाली. परिणामी ऑक्टोबर २०१९ पासून शेतकरी कर्जमाफीची यादीच लागली नाही.

या यादीत राज्यातील सहा लाख शेतकरी अडकले आहेत. यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यांनी जुन्या सरकारच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली नाही. त्यांनी नव्याने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील शेतकरी आले नाही. त्यांची ग्रीन यादी लागलीच नाही. तब्बल तीन वर्षे लोटली, तरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचलेले नाही.

आता नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या काळात तरी कर्जमाफीला मुकलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. अद्याप त्यावर धोरणात्मक निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, कर्जमाफी विभागाने राज्य शासनाकडे याबाबतचा अहवाल वारंवार सादर केला; मात्र अद्याप तरतूद झाली नाही.

महात्मा फुले योजनेतील ४५ हजार शेतकरी

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या या कर्जमाफी योजनेत विविध कारणांनी ४५ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले आहे. त्यांनाही रक्कम मिळालेली नाही.

राज्यातील सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकलेले आहेत. याबाबतचा अहवाल सहकार विभागाने राज्य शासनाकडे पाठविला. यासाठी पाच हजार ९०० कोटींची तरतूद आवश्यक आहे.

- दिगांबर साळुंके, उपनिबंधक कर्जमाफी सेल, पुणे.

यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना थकीत कर्जाची रक्कम मिळावी. दोन्ही सरकारच्या काळातील थकलेल्या कर्जमाफीच्या रकमेतील पात्र शेतकऱ्यांचे पैसे मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे.

- भावना गवळी, खासदार, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जYavatmalयवतमाळ