शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकले; ५९०० कोटी मिळालेच नाही

By रूपेश उत्तरवार | Updated: January 3, 2023 15:49 IST

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी रेड यादीने लटकले

यवतमाळ : भाजप-शिवसेना युती काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेत प्रारंभापासून अनेक तांत्रिक अडचणी आल्या. रेड, येलो, ग्रीन यादी आल्यानंतरच कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले. मात्र, अद्याप त्यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीची रक्कम सहा लाख शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

प्रक्रिया राबविताना विलंब झाला. नंतरच्या काळात सरकार बदलले. या गोंधळात राज्यातील सहा लाख शेतकरी अडचणीत सापडले. हे शेतकरी कर्जमाफीला पात्र असले, तरी त्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ५९०० कोटी अद्याप जमाच झाले नाही. नव्याने शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तत्कालीन युती सरकारने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. योजनेच्या अंमलबजावणीच्या काळात आचारसंहिता लागू झाली. परिणामी ऑक्टोबर २०१९ पासून शेतकरी कर्जमाफीची यादीच लागली नाही.

या यादीत राज्यातील सहा लाख शेतकरी अडकले आहेत. यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यांनी जुन्या सरकारच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली नाही. त्यांनी नव्याने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील शेतकरी आले नाही. त्यांची ग्रीन यादी लागलीच नाही. तब्बल तीन वर्षे लोटली, तरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचलेले नाही.

आता नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या काळात तरी कर्जमाफीला मुकलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. अद्याप त्यावर धोरणात्मक निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, कर्जमाफी विभागाने राज्य शासनाकडे याबाबतचा अहवाल वारंवार सादर केला; मात्र अद्याप तरतूद झाली नाही.

महात्मा फुले योजनेतील ४५ हजार शेतकरी

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या या कर्जमाफी योजनेत विविध कारणांनी ४५ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकले आहे. त्यांनाही रक्कम मिळालेली नाही.

राज्यातील सहा लाख शेतकरी कर्जमाफीला मुकलेले आहेत. याबाबतचा अहवाल सहकार विभागाने राज्य शासनाकडे पाठविला. यासाठी पाच हजार ९०० कोटींची तरतूद आवश्यक आहे.

- दिगांबर साळुंके, उपनिबंधक कर्जमाफी सेल, पुणे.

यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना थकीत कर्जाची रक्कम मिळावी. दोन्ही सरकारच्या काळातील थकलेल्या कर्जमाफीच्या रकमेतील पात्र शेतकऱ्यांचे पैसे मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे.

- भावना गवळी, खासदार, यवतमाळ.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जYavatmalयवतमाळ