शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 13:06 IST

धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला.

ठळक मुद्देसाडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ सांडला सहा महिन्यांपासून चिमुकले वंचित

यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठविला जाणारा तांदूळ अक्षरश: मजुरांच्या पायाखाली तुडविला जात आहे. भारतीय अन्न महामंडळाने मजबूत पोत्यांची सोय न केल्यामुळे तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ सांडला. येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. आधीच सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा नसताना आता कसाबसा आलेला तांदूळही पायदळी तुडविला गेल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे आणखी काही दिवस हाल होणार आहेत.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेतून शाळेत गरमागरम चवदार खिचडी दिली जाते. कोरोनाकाळात शाळेत खिचडी शिजविणे थांबले. त्याऐवजी विद्यार्थ्यांना घरपोच तांदूळ दिले जात आहे. मात्र, ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर या कालावधीतील तांदूळ जिल्ह्यात आलाच नाही. या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीचा १९७९ मेट्रिक टन आणि चौथ्या तिमाहीचा ५०० मेट्रिक टन, असा एकूण २४९८.६७ मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यात पोहोचला नव्हता.

त्यातच जानेवारी २०२२ ते मार्च या तिमाहीसाठी शिक्षण विभागाने वर्ग १ ते ५ साठी १२३ मेट्रिक टन व वर्ग ६ ते ८ साठी ९५६.६४ मेट्रिक टन तांदळाची मागणी भारतीय अन्न महामंडळाच्या अमरावती येथील व्यवस्थापकांकडे नोंदविली. हा तांदूळ महामंडळाने जिल्ह्यात पाठविला. परंतु येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात जेव्हा हा १४४० मेट्रिक टन तांदूळ पोहोचला तेव्हा तांदळाची पोती अत्यंत जीर्ण असल्याचे दिसून आले. हमालांनी पोते उचलताच फाटून त्यातील अर्धा अधिक तांदूळ खाली सांडला. त्यावर अक्षरश: मजुरांचे पाय पडले. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ जमिनीवर साचला. त्यामुळे संबंधित पुरवठादाराने जेव्हा शाळांपर्यंत तांदूळ पोहोचविण्यासाठी या गोदामातून ४२० पोत्यांची उचल केली, तेव्हा त्यात २५२ पोते फाटलेले आणि हातशिलाई केलेले आढळून आले.

पुरवठादाराने कसाबसा हा तांदूळ या महिन्यात शाळांपर्यंत नेला असता पोत्यांची अवस्था पाहूनच अनेक मुख्याध्यापकांनी तांदूळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे १८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांना तांदूळ मिळाला नाही. मजुरांनी पायदळी तुडविलेला तांदूळ आता शाळेपर्यंत पोहोचविला गेला, तरी त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उन्हाळी सुटीतील खिचडी शिजणार का?

जीर्ण पोत्यांमुळे साडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ कमी आल्याची तक्रार शिक्षण विभागाने एफसीआयकडे नोंदविली आहे. मुळात एफसीआयच्या धामणगाव येथील डेपोमधून मागणी केलेल्या १९७९ मेट्रिक टन पैकी केवळ १४४० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा करण्यात आला. त्यात ५१८ मेट्रिक टन कमी पाठविण्यात आले. तर आलेल्या १४४० मेट्रिक टनातूनही ५३९ मेट्रिक टन तांदूळ जीर्ण पोत्यांमुळे खाली सांडला. आता तरी चांगल्या पोत्यांचा वापर करून तांदूळ पाठवावा, अशी मागणी एफसीआयकडे करण्यात आली आहे. मात्र, या मागणीची मुदत ३१ मार्च असून तोपर्यंत तांदूळ न आल्यास उन्हाळी सुटीच्या कालावधीतील गोरगरीब विद्यार्थ्यांची खिचडी शिजणे कठीण आहे.

टॅग्स :Educationशिक्षणfoodअन्नGovernmentसरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्रYavatmalयवतमाळ