शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 13:06 IST

धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला.

ठळक मुद्देसाडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ सांडला सहा महिन्यांपासून चिमुकले वंचित

यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठविला जाणारा तांदूळ अक्षरश: मजुरांच्या पायाखाली तुडविला जात आहे. भारतीय अन्न महामंडळाने मजबूत पोत्यांची सोय न केल्यामुळे तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ सांडला. येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. आधीच सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा नसताना आता कसाबसा आलेला तांदूळही पायदळी तुडविला गेल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे आणखी काही दिवस हाल होणार आहेत.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेतून शाळेत गरमागरम चवदार खिचडी दिली जाते. कोरोनाकाळात शाळेत खिचडी शिजविणे थांबले. त्याऐवजी विद्यार्थ्यांना घरपोच तांदूळ दिले जात आहे. मात्र, ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर या कालावधीतील तांदूळ जिल्ह्यात आलाच नाही. या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीचा १९७९ मेट्रिक टन आणि चौथ्या तिमाहीचा ५०० मेट्रिक टन, असा एकूण २४९८.६७ मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यात पोहोचला नव्हता.

त्यातच जानेवारी २०२२ ते मार्च या तिमाहीसाठी शिक्षण विभागाने वर्ग १ ते ५ साठी १२३ मेट्रिक टन व वर्ग ६ ते ८ साठी ९५६.६४ मेट्रिक टन तांदळाची मागणी भारतीय अन्न महामंडळाच्या अमरावती येथील व्यवस्थापकांकडे नोंदविली. हा तांदूळ महामंडळाने जिल्ह्यात पाठविला. परंतु येथील धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात जेव्हा हा १४४० मेट्रिक टन तांदूळ पोहोचला तेव्हा तांदळाची पोती अत्यंत जीर्ण असल्याचे दिसून आले. हमालांनी पोते उचलताच फाटून त्यातील अर्धा अधिक तांदूळ खाली सांडला. त्यावर अक्षरश: मजुरांचे पाय पडले. थोडाथोडका नव्हे तर तब्बल ५३९ मेट्रिक टन तांदूळ जमिनीवर साचला. त्यामुळे संबंधित पुरवठादाराने जेव्हा शाळांपर्यंत तांदूळ पोहोचविण्यासाठी या गोदामातून ४२० पोत्यांची उचल केली, तेव्हा त्यात २५२ पोते फाटलेले आणि हातशिलाई केलेले आढळून आले.

पुरवठादाराने कसाबसा हा तांदूळ या महिन्यात शाळांपर्यंत नेला असता पोत्यांची अवस्था पाहूनच अनेक मुख्याध्यापकांनी तांदूळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे १८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांना तांदूळ मिळाला नाही. मजुरांनी पायदळी तुडविलेला तांदूळ आता शाळेपर्यंत पोहोचविला गेला, तरी त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उन्हाळी सुटीतील खिचडी शिजणार का?

जीर्ण पोत्यांमुळे साडेपाचशे मेट्रिक टन तांदूळ कमी आल्याची तक्रार शिक्षण विभागाने एफसीआयकडे नोंदविली आहे. मुळात एफसीआयच्या धामणगाव येथील डेपोमधून मागणी केलेल्या १९७९ मेट्रिक टन पैकी केवळ १४४० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा करण्यात आला. त्यात ५१८ मेट्रिक टन कमी पाठविण्यात आले. तर आलेल्या १४४० मेट्रिक टनातूनही ५३९ मेट्रिक टन तांदूळ जीर्ण पोत्यांमुळे खाली सांडला. आता तरी चांगल्या पोत्यांचा वापर करून तांदूळ पाठवावा, अशी मागणी एफसीआयकडे करण्यात आली आहे. मात्र, या मागणीची मुदत ३१ मार्च असून तोपर्यंत तांदूळ न आल्यास उन्हाळी सुटीच्या कालावधीतील गोरगरीब विद्यार्थ्यांची खिचडी शिजणे कठीण आहे.

टॅग्स :Educationशिक्षणfoodअन्नGovernmentसरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्रYavatmalयवतमाळ