शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर ‘रिलीज’

By admin | Updated: January 13, 2017 01:31 IST

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल््यातील २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून थांबवून ठेवले.

मुख्याध्यापक कात्रीतच : शिक्षकांची उपसंचालकांकडे धावयवतमाळ : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल््यातील २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून थांबवून ठेवले. या अन्यायग्रस्त शिक्षकांनी विमाशीच्या थेट शिक्षण उपसंचालकांकडे धाव घेतल्यानंतर अखेर त्यांचे वेतन अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.२०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी माध्यमिक विद्यालयातील १२४ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन ज्या शाळांमध्ये करण्यात आले होते, तेथील संस्थाचालकांनी समायोजनच अमान्य केले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना तेथे अद्यापही रूजू होता आलेले नाही. अशा संस्थाचालकांबाबत कठोर भूमिका घेताना शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शाळांमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचेच वेतन गोठविले. २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात या शाळांमधील कर्मचारी आणि अतिरिक्त शिक्षकांनी ७ जानेवारीला धरणे आंदोलन केले. त्यानंतर थेट अमरावती येथे शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. अखेर ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह एम. डी. धनरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होत असले तरी संबंधित मुख्याध्यापकांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)