शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

ठळक मुद्दे‘लालपरी’ला प्रवाशांचा प्रतिसाद : लॉकडाऊन काळात मात्र कोटवधींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून लॉकडाऊनच्या काळात करोडो रूपयांचे नुकसान सहन करणारी लालपरी अर्थात महामंडळाची एस.टी.बस हळूहळू सावरू लागली आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा मिळाल्यानंतर वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ झाली आहे.लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. लॉकडाऊनपूर्वी हेच उत्पन्न पाचपटीत होते. डिसेंबर महिन्यात वणी आगाराला एक कोटी २१ लाख ९० हजार ५५८ रूपये, जानेवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ७७ हजार ९२९, फेब्रुवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ८९ हजार ६८२ रूपयांचे उत्पन्न वणी आगाराला झाले. मात्र कोरोनानंतर मार्च महिन्यापासून एसटीच्या उत्पन्नात कमालिची घट झाली. मागील आठवडाभरापासून वणी आगारातील एस.टी.बसेस पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन रस्त्याने धावत आहेत. प्रवाशांचाही एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र येथे पहायला मिळते. सध्यस्थितीत वणी आगाराला एका दिवशी एक लाख १० हजार रूपयापर्यंतचे उत्पन्न होत आहे. वणी आगारातून वणी-यवतमाळ, वणी-नागपूर, वणी-चंद्रपूर या मार्गाने प्रवासी वाहतूक केली जात आहे. दररोज पाच हजार ५०० किलोमीटरचा पल्ला वणी आगारातील बसेस गाठत आहेत. यवतमाळ व नागपुरसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर तासाला बसेस सुटत आहेत.लॉकडाऊनच्या काळात एसटी बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहतुकदारांना झाला. विशेष म्हणजे प्रवासी वाहतूक करताना काही कठोर नियम घालून देण्यात आले होते. परंतु खासगी वाहतुकदारांकडून हे नियम पायदळी तुडविण्यात आले. खासगी वाहनात तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक करण्यात आली.कर्मचारी पाच महिन्यांपासून वेतनाविनाएसटी बंद असल्याने उत्पन्नात घट आली. त्याचा फटका एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बसला. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतनच देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उसणवारी करून जगण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :state transportएसटी