शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सहा नगरपंचायतींमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळीच थांबला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी मतदार आपला हक्क बजावणार आहे. तब्बल ४७ हजार ६९८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत. महिला मतदार २५२६ आहेत. सर्वाधिक मतदार संख्या ही कळंब नगरपंचायतीची आहे. तेथे १४ हजार २०६ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष ७०८८, महिला ७११८ आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या राळेगाव येथे १२ हजार १२७ इतकी आहे. त्यात पुरुष ६६२५, तर ६५०२ महिला आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या झरी  येथे २२६८ आहे. पुरुष १ हजार १५२ तर महिला १ हजार ११६ आहे. महागाव नगरपंचायतीमध्ये सात हजार ५२० मतदार असून पुरुष तीन हजार ९०, महिला तीन हजार ६१९, तर तृतीयपंथी एक आहे. मारेगाव येथे ६५०७ मतदार आहे. त्यात पुरुष तीन हजार २५१ तर महिला मतदार तीन हजार २५६ आहेत. प्रत्येक मतदाराचे मतदान झालेच पाहिजे यासाठी उमेदवारच धडपड करीत आहे. मतदानाची टक्केवारीही ८० च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. 

खर्च मर्यादा दीड लाखाची, शेवटची रात्र बाकी- नगरपंचायतीच्या एका उमेदवाराला प्रचार-प्रसारावर खर्च मर्यादा केवळ दीड लाखाची आहे. अनेकांनी हे बजेट कधीच पूर्ण केले आहे. आता तर शेवटची रात्री बाकी आहे. शेवटच्या रात्रीतच पैशाचा धुराळा केला जातो. रात्रीतून बाजी पलटविण्यासाठी आर्थिक सक्षमताच दाखविली जाते. त्यामुळे दीड लाखाची खर्च मर्यादा खरोखरच पाळली जाते का, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक