शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सहा नगरपंचायतींमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळीच थांबला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी मतदार आपला हक्क बजावणार आहे. तब्बल ४७ हजार ६९८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत. महिला मतदार २५२६ आहेत. सर्वाधिक मतदार संख्या ही कळंब नगरपंचायतीची आहे. तेथे १४ हजार २०६ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष ७०८८, महिला ७११८ आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या राळेगाव येथे १२ हजार १२७ इतकी आहे. त्यात पुरुष ६६२५, तर ६५०२ महिला आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या झरी  येथे २२६८ आहे. पुरुष १ हजार १५२ तर महिला १ हजार ११६ आहे. महागाव नगरपंचायतीमध्ये सात हजार ५२० मतदार असून पुरुष तीन हजार ९०, महिला तीन हजार ६१९, तर तृतीयपंथी एक आहे. मारेगाव येथे ६५०७ मतदार आहे. त्यात पुरुष तीन हजार २५१ तर महिला मतदार तीन हजार २५६ आहेत. प्रत्येक मतदाराचे मतदान झालेच पाहिजे यासाठी उमेदवारच धडपड करीत आहे. मतदानाची टक्केवारीही ८० च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. 

खर्च मर्यादा दीड लाखाची, शेवटची रात्र बाकी- नगरपंचायतीच्या एका उमेदवाराला प्रचार-प्रसारावर खर्च मर्यादा केवळ दीड लाखाची आहे. अनेकांनी हे बजेट कधीच पूर्ण केले आहे. आता तर शेवटची रात्री बाकी आहे. शेवटच्या रात्रीतच पैशाचा धुराळा केला जातो. रात्रीतून बाजी पलटविण्यासाठी आर्थिक सक्षमताच दाखविली जाते. त्यामुळे दीड लाखाची खर्च मर्यादा खरोखरच पाळली जाते का, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक