शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सहा नगरपंचायतींमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळीच थांबला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी मतदार आपला हक्क बजावणार आहे. तब्बल ४७ हजार ६९८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत. महिला मतदार २५२६ आहेत. सर्वाधिक मतदार संख्या ही कळंब नगरपंचायतीची आहे. तेथे १४ हजार २०६ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष ७०८८, महिला ७११८ आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या राळेगाव येथे १२ हजार १२७ इतकी आहे. त्यात पुरुष ६६२५, तर ६५०२ महिला आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या झरी  येथे २२६८ आहे. पुरुष १ हजार १५२ तर महिला १ हजार ११६ आहे. महागाव नगरपंचायतीमध्ये सात हजार ५२० मतदार असून पुरुष तीन हजार ९०, महिला तीन हजार ६१९, तर तृतीयपंथी एक आहे. मारेगाव येथे ६५०७ मतदार आहे. त्यात पुरुष तीन हजार २५१ तर महिला मतदार तीन हजार २५६ आहेत. प्रत्येक मतदाराचे मतदान झालेच पाहिजे यासाठी उमेदवारच धडपड करीत आहे. मतदानाची टक्केवारीही ८० च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. 

खर्च मर्यादा दीड लाखाची, शेवटची रात्र बाकी- नगरपंचायतीच्या एका उमेदवाराला प्रचार-प्रसारावर खर्च मर्यादा केवळ दीड लाखाची आहे. अनेकांनी हे बजेट कधीच पूर्ण केले आहे. आता तर शेवटची रात्री बाकी आहे. शेवटच्या रात्रीतच पैशाचा धुराळा केला जातो. रात्रीतून बाजी पलटविण्यासाठी आर्थिक सक्षमताच दाखविली जाते. त्यामुळे दीड लाखाची खर्च मर्यादा खरोखरच पाळली जाते का, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक