शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:31 IST

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष.

यवतमाळ -  साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष. आता ९२ व्या संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळातच ग्रंथप्रदर्शनाच्या परंपरेलाही ४५ वर्षे पूर्ण होत आहे.येत्या जानेवारी महिन्यात ११, १२ आणि १३ रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन हे जसे साहित्यिकांचे असते, तसेच रसिकांचेही असते. त्यामुळेच संमेलनस्थळी दरवर्षी कोट्यवधींच्या पुस्तकांची विक्री होत असते. आता यवतमाळच्या संमेलनातही ग्रंथप्रदर्शन भरविण्यासाठी अयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १९७३ साली यवतमाळात कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी पहिल्यांदाच यवतमाळच्या पावनभूमीत ग्रंथप्रदर्शनाचे रोपटे लावण्यात आले. आज ४५ वर्षानंतर या उपक्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले. जेव्हा पहिल्यांदा यवतमाळात संमेलन झाले, त्यावेळी अवघ्या एका वर्गखोलीत पुस्तकांचे दोन स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी एक होता ‘मौज’ प्रकाशनाचा, तर दुसरा होता महाराष्ट्र शासनाचा. या छोट्याशा ग्रंथप्रदर्शनाला त्यावेळी सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, आणि यशवंतराव चव्हाण आदींनी भेटी दिल्याचे ‘मौज’चे प्रतिनिधी अरुण गाडगीळ यांनी सांगितले. यवतमाळात होऊ घातलेल्या ९२ व्या साहित्य संमेलनाचे ग्रंथप्रदर्शन हे एक आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. यवतमाळ ते यवतमाळ हा ४५ वर्षांचा ग्रंथप्रदर्शनाचा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत अरुण जाखडे यांनी ‘गोंदण’ स्मरणिकेच्या लेखातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :marathiमराठी