शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:31 IST

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष.

यवतमाळ -  साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष. आता ९२ व्या संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळातच ग्रंथप्रदर्शनाच्या परंपरेलाही ४५ वर्षे पूर्ण होत आहे.येत्या जानेवारी महिन्यात ११, १२ आणि १३ रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन हे जसे साहित्यिकांचे असते, तसेच रसिकांचेही असते. त्यामुळेच संमेलनस्थळी दरवर्षी कोट्यवधींच्या पुस्तकांची विक्री होत असते. आता यवतमाळच्या संमेलनातही ग्रंथप्रदर्शन भरविण्यासाठी अयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १९७३ साली यवतमाळात कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी पहिल्यांदाच यवतमाळच्या पावनभूमीत ग्रंथप्रदर्शनाचे रोपटे लावण्यात आले. आज ४५ वर्षानंतर या उपक्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले. जेव्हा पहिल्यांदा यवतमाळात संमेलन झाले, त्यावेळी अवघ्या एका वर्गखोलीत पुस्तकांचे दोन स्टॉल लावण्यात आले होते. त्यापैकी एक होता ‘मौज’ प्रकाशनाचा, तर दुसरा होता महाराष्ट्र शासनाचा. या छोट्याशा ग्रंथप्रदर्शनाला त्यावेळी सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, आणि यशवंतराव चव्हाण आदींनी भेटी दिल्याचे ‘मौज’चे प्रतिनिधी अरुण गाडगीळ यांनी सांगितले. यवतमाळात होऊ घातलेल्या ९२ व्या साहित्य संमेलनाचे ग्रंथप्रदर्शन हे एक आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. यवतमाळ ते यवतमाळ हा ४५ वर्षांचा ग्रंथप्रदर्शनाचा प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत अरुण जाखडे यांनी ‘गोंदण’ स्मरणिकेच्या लेखातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :marathiमराठी